PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 16 OCT 2020 7:44PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

दिल्ली-मुंबई,16 ऑक्टोबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अन्न आणि कृषी संघटनेच्या 75व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष नाणे जारी करण्यात आले, या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण : यासाठी येथे क्लिक करा

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

दहा लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी मृत्यू असलेल्या जगभरातल्या देशांमध्ये भारत अद्यापही समाविष्ट आहे. 2 ऑक्टोबरपासून सातत्याने 1100 पेक्षा कमी मृत्यूंची नोंद झाली आहे.  22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांची कामगिरी चांगली असून या राज्यात, दहा लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. मृत्यू दरात सातत्याने घट होत असून सध्या हा दर 1.52% आहे. 22 मार्च 2020 पासून हा सर्वात कमी दर आहे.  कोविड व्यवस्थापन आणि प्रतिसादाचा भाग म्हणून केंद्र सरकार कोविडचा प्रसार रोखण्याबरोबरच गंभीर रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवून मृत्यू दर कमी करण्यावरही विशेष लक्ष पुरवत आहे. केंद्र सरकार आणि केंद्र शासित प्रदेश/राज्य सरकार यांच्या समन्वित प्रयत्नातून देशभरात आरोग्य सुविधा बळकट करण्यात आल्या आहेत. 2212 कोविड समर्पित रुग्णालये दर्जेदार आरोग्य सेवा पुरवत आहेत. केंद्र सरकारने वैद्यकीय उपचार नियमावलीत प्रमाणित मार्गदर्शक सूचनांचा समावेश केल्याने सरकारी आणि खाजगी  रुग्णालयातही प्रमाणित दर्जाची वैद्यकीय सेवा सुनिश्चित झाली आहे.

मृत्यू दर कमी आणण्याच्या दृष्टीने, गंभीर रुग्णांच्या वैद्यकीय व्यवस्थापनात आयसीयू डॉक्टर्सच्या क्षमता वृद्धीसाठी नवी दिल्लीतल्या एम्सने ई आयसीयू हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. राज्यांच्या रुग्णालयात आयसीयू विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी मंगळवार आणि शुक्रवार  या आठवड्यातल्या दोन दिवशी तज्ञाकडून टेली/ व्हिडीओ सल्ला सत्र घेण्यात येते. 8 जुलै 2020 पासून ही सत्रे सुरु झाली आहेत. 

आतापर्यंत 23 टेली सत्रे झाली असून 34 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशातल्या 334  संस्थांनी यात सहभाग घेतला आहे. नव्या रुग्णांपेक्षा, बरे झालेल्यांची संख्या जास्त नोंदवण्याचा कल कायम असून गेल्या 24 तासात 70,338  रुग्ण कोरोनातून बरे झाले तर 63,371  नव्या रुग्णांची नोंद झाली. बरे झालेले आणि सक्रीय रुग्ण यातले अंतर  56  लाखाहून अधिक (56,49,251) झाले आहे.बरे झालेल्यांची संख्या  सध्या सक्रीय रुग्णांच्या आठपट जास्त आहे.

सक्रीय रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. सध्या सक्रीय रुग्ण हे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या 10.92%  म्हणजे 8,04,528 आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने यासाठीच्या राष्ट्रीय दरात सुधारणा होऊन तो 87.56% झाला आहे.

बरे झालेल्यांपैकी 78% हे 10 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशातील आहेत.यामध्ये महाराष्ट्राची संख्या मोठी असून  महाराष्ट्रात एका दिवसात  13,000 पेक्षा जास्त रुग्ण कोरोनातून मुक्त झाले.

नव्या रुग्णांपैकी  79%  रुग्ण 10 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे  10,000  पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली असून त्या खालोखाल कर्नाटक मध्ये 8,000  रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात  895 मृत्यूंची नोंद झाली.   यापैकी सुमारे 82% मृत्यू  महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, छत्तीसगड,आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश,पंजाब, ओडिशा आणि दिल्ली या दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात  37% पेक्षा जास्त म्हणजे 337 मृत्यूंची नोंद झाली. 13 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात दहा लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने केरळ, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये उच्चस्तरीय केंद्रीय समूह नियुक्त करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये या पाच राज्यांमध्ये कोविड रूग्णसंख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून आली आहे, त्याची कारणे शोधून उपाय योजना करण्यासाठी या समूहाची मदत होवू शकणार आहे.

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक अन्न दिवस साजरा करण्यात आला. एफएसएसएआयने याचे आयोजन केले होते. एकत्रित वाढ, पोषण ही यावर्षीची संकल्पना होती. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ अश्विनीकुमार चौबे कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले.

 

इतर अपडेट्स:

 

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्रात गुरुवारी 10226 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे, यामुळे एकूण रुग्णांची संख्या 15,64,615 इतकी झाली आहे. राज्यात गुरुवारी कोविडमुळे 337 रुग्णांचा मृत्यू झाला, यामुळे एकूण मृत्यू संख्या 41,196 एवढी झाली आहे. दिवसभरात 13,714 रुग्ण बरे झाले असून यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या 13,30,483 झाली आहे. सध्या राज्यात 1,92,459 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत 2,119 नवीन कोविड रूग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या 2,36,721 झाली आहे. गुरुवारी कोविडमुळे 46 रुग्णांचा मृत्य झाला असून एकूण 9,601 मृत्यू झाले आहेत. पुण्यात 551 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या 1,66,930 एवढी झाली आहे तर या आजारामुळे आणखी 54 जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृत्यू संख्या 3,812 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 79,14,651 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.

 

Image

* * *

S.Thakur/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1665255) Visitor Counter : 223