PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 24 SEP 2020 7:51PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 24 सप्टेंबर 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

‘फिट इंडिया मुव्हमेंट’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी साधलेला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे 26 सप्टेंबर 2020 रोजी आभासी द्विपक्षीय शिखर परिषद घेणार आहेत.

कोविड प्रादुर्भावाचे आधिक्य असणाऱ्या सात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या आभासी माध्यमातील बैठकीत पंतप्रधानांचे संबोधन

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

सलग सहाव्या दिवशी नवीन कोविड रुग्णांची संख्या बरे झालेल्या नवीन रुग्णांपेक्षा कमी नोंदवली गेली आहे.

देशात गेल्या 24 तासात 86,508 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.  यापैकी 75 टक्के नवीन रुग्ण 10 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

महाराष्ट्र सर्वोच्च स्थानावर कायम आहे. केवळ महाराष्ट्रात 21,000 पेक्षा जास्त नवे रुग्ण असून आंध्रप्रदेश मध्ये 7,000 पेक्षा जास्त तर कर्नाटकमध्ये 6,000 पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत.

गेल्या 24 तासात 1,129 रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात कोविडमुळे मृत्यू झालेल्यांपैकी 80 टक्के मृत्यू हे दहा राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्रात 479, उत्तरप्रदेशमध्ये 87 तर पंजाबमध्ये 64 मृत्यूंची नोंद झाली.

भारताने देशातील कोविड चाचणीच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. देशात 1810 प्रयोगशाळा सून यामध्ये 1082 सरकारी आणि 728 खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 11,56,569 चाचण्या घेण्यात आल्या असून एकूण चाचण्यांच्या संख्येने 6.74 कोटींचा आकडा पार केला आहे.

लक्ष्य केंद्रित धोरण आणि प्रभावी लोककेंद्रित उपाययोजना यामुळे भारतात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. भारतात सलग सहाव्या दिवशी नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे.

प्रभावी चाचण्या, शोध, उपचार, सर्वेक्षण आणि सुस्पष्ट संदेश याचा हा परिणाम असून पंतप्रधानांनी काल सात राज्य/केंद्रशासित प्रदेशांबरोबर झालेल्या आढावा बैठकीत यावर भर दिला.

गेल्या 24 तासात देशात 87,374 इतके रुग्ण बरे झाले तर एकूण 86,508 जणांना कोविडची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 46.7 (46,74,987) लाख इतकी झाली असून रुग्ण बरे होण्याच्या दराने 81.55 टक्क्यांचा आकडा पार केला आहे.

नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त झाल्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत वाढत आहे.

बरे झालेले रुग्ण (46,74,987) सक्रिय (9,66,382) रुग्णांपेक्षा 37 लाखांनी जास्त आहे. तसेच सक्रिय रुग्णसंख्या एकूण बाधित रुग्णांच्या 16.86 टक्के इतकी आहे. सक्रिय रुग्णसंख्येत हळूहळू घट दिसून येत आहे.

राष्ट्रीय स्तरानंतर 13 राज्यातही नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 74 टक्के 10 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्राने 19476 प्रकारणांसह (22.3%) सलग सहाव्या दिवशी हे प्रमाण कायम ठेवले आहे.

'चेस द व्हायरस''चा पाठपुरावा करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या 'टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ या केंद्राच्या नेतृत्त्वातील कृतीशील धोरणाद्वारे हे शक्य झाले आहे. केंद्राने जारी केलेल्या स्टँडर्ड ऑफ केअर प्रोटोकॉलच्या माध्यमातून उच्च गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवेद्वारे जास्तीत जास्त चाचण्या, त्वरित निरीक्षण आणि ट्रॅकिंगद्वारे लवकरात लवकर रुग्ण शोधत आल्यामुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

केंद्र आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांचे रुग्णालयांमधील सुधारित आणि प्रभावी वैद्यकीय उपचार, गृह अलगीकरणावरील लक्ष, स्टिरॉइड्सचा वावर, अँटिकोआगुलंट्सचा वापर आणि त्वरित आणि वेळेवर उपचार याकरीता रूग्णांसाठी रुग्णवाहिकांच्या सुधारित सेवा यावर सतत लक्ष केंद्रित केले गेले आहे. आशा कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे गृह अलगीकरणामधील प्रभावी देखरेखीचा व रुग्णांच्या प्रगतीचा मागोवा घेण्यात आला आहे.

‘ईसंजीवनी’ डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून टेलिमेडिसिन सेवा, कोविडचा प्रसार रोखण्यात यशस्वी ठरल्या आहेत, त्याचबरोबर कोविड नसलेल्या अत्यावश्यक आरोग्य सेवाही उपलब्ध होत आहे. आयसीयूमधील डॉक्टरांच्या क्लिनिकल मॅनेजमेंट क्षमता वाढवण्यावर केंद्राचा भर आहे. एम्स, नवी दिल्लीच्या तज्ञांनी घेतलेल्या ‘नॅशनल ई-आयसीयू ऑन कोविड-19 मॅनेजमेंट’ उपक्रमामुळे यामध्ये भरीव मदत झाली आहे. 28 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात 278 संस्था आणि उत्कृष्टता केंद्रांमध्ये अशी 20 सत्रे घेण्यात आली आहेत.

इतर अपडेट्स:

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वास व्यक्त केला आहे की सरकारने नुकत्याच सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ या थेट संपर्क मोहिमेमुळे राज्यात कोविड-19 विरूद्धचा लढा आणखी मजबूत होईल. राज्यात आजपर्यंत 2.73 लाखांहून अधिक सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यभरातील 2.25 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी 59 हजार आरोग्य पथकांची स्थापना करण्यात आली आहे. कोविड -19 विषयी जनजागृती करण्याबरोबरच, मोहिमेमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येण्याबाबत विचार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी झालेल्या कोविड आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्याच्या उपक्रमाबाबत माहिती दिली.

 

M.C/S.T/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1658792) Visitor Counter : 188