PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 02 JUN 2020 7:56PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 2 जून 2020

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

आरोग्य मंत्रालयाची कोविड 19 घडामोडींवरील माहिती :

देशात रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्याने सुधारणा होत आहे, कोविड19 मधून एकूण 95,527 रुग्ण बरे झाले असून, गेल्या 24 तासात 3,708 जण कोविड मधून बरे झाले आहेत. बरे होण्याचा दर आता 48.07 % झाला आहे,15 एप्रिलला हा दर 11.42 % होता.

आपल्या देशात, प्रति लाख लोकसंख्येच्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यूदर जगात सर्वात कमी (0.41)आहे, मात्र जगात असेही काही देश आहेत, जिथे हे प्रमाण 62 आणि 82 इतकं आहे. आपल्या देशातला 2.82% हा कोविड19 मृत्यू दर 6.13% या जागतिक मृत्यू दराशी तुलना करता जगातील सर्वात कमी दरापैकी आहे.

कोविड वर आपत्कालीन उपचारांसाठी 'रेमडेसिवीर' औषधाच्या वापरला परवानगी देण्यात आली आहे. देशात कोविड19 मुळे झालेल्या मृत्युपैकी 73% लोक मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय रोग आणि श्वसन रोग यासारख्या आजारानेही ग्रस्त होते. देशातील कोविडच्या प्रत्येक दोन मृत्यूमागे एक मृत्यू ज्येष्ठ नागरिकाचा झाला आहे, जे आपल्या एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के आहेत. जागरूक रहा, प्रतिबंधात्मक उपाय जारी ठेवा, कोविड19साठी वेळीच सल्ला आणि उपचार घ्या असे आवाहन आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात आले आहे.

भारतीय RNA नमुने घेण्याचे किट्स आता आपल्याकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. 10 ते 12 भारतीय उत्पादकांनी तयार केलेल्या RT-PCR किट्स आता वापरल्या जात आहेत. देशांतर्गत उत्पादकांनी दिलेल्या योगदानामुळे चाचण्यांच्या क्षमतेत सध्या आपण बऱ्याच अंशी सुस्थितीत आहोत अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे. कोविड19 च्या चाचण्यांची क्षमता वाढवण्यावर ICMR चा भर आहे, आता आपल्या देशातील प्रत्येक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात चाचण्यांची क्षमता विकसित झाली आहे, आपल्याकडे एकूण 681 प्रयोगशाळा आहेत, त्यापैकी 476 सरकारी आहेत आणि आता आपण दररोज सरासरी 1.2 लाख नमुन्यांच्या चाचण्या करत आहोत.

इतर अपडेट्स:

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्र राज्यात गेल्या 24 तासात कोविड-19 चे 2361 नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 70,013 झाली आहे. तर गेल्या 24 तासात 76 लोकांचा मृत्यू झाला असून या आजारामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2,362 इतकी झाली आहे. राज्यात एकूण 37,543 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात झाल्या असून हा आकडा 4,71,473 इतका आहे.

पश्चिम महानगरे कोरोना विषाणूच्या महामारीचा सामना करत असले तरी ते निसर्ग चक्रीवादळाचाही सामना करण्यासाठी सज्ज होत आहे. निसर्ग हे चक्रीवादळ ताशी 100-110 किलोमीटर वेगाच्या वाऱ्याने 3 जूनच्या दुपारी अलिबाग पार करण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य प्रशासनाने बीकेसी अर्थात वांद्रे कुर्ला संकुल मधल्या तात्पुरत्या सोयीसाठीच्या निवाऱ्यातून लक्षणे नसलेल्या 150 कोविड रुग्णांना  वरळी इथल्या आच्छादित छप्पर असलेल्या सुविधेत हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

RT/ST/PM

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1628751) Visitor Counter : 268