Posted On:
31 JUL 2020 8:13PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 31 जुलै 2020
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 च्या अंतिम फेरी सोहळ्याला एक ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. या प्रसंगी ते विद्यार्थ्यांशीही संवाद साधतील. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हे संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ आहे. या व्यासपीठामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. त्याचबरोबर उत्पादनाच्या बाबतीतील संशोधन आणि समस्या सोडवण्याच्या दिशेने विचार करण्याची सवय या गोष्टींची रुजुवात होईल. तरुण वर्गाला वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने याचा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 संदर्भातल्या उच्च स्तरीय मंत्री गटाची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे 19 वी बैठक झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी, जहाज बांधणी राज्य मंत्री मनसुख लाल मांडवीय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे आणि गृह राज्य मंत्री नित्यानंद राय या बैठकीला उपस्थित होते.
कोविड-19 संदर्भातल्या भारतातल्या स्थितीची मंत्री गटाला माहिती देण्यात आली. भारतात 1 दशलक्ष पेक्षा जास्त रुग्ण कोविड-19 मधून बरे झाले असून भारताने हा महत्वपूर्ण टप्पा गाठला असून रुग्ण बरे होण्याचा दर 64.54%.झाला आहे. म्हणजेच वैद्यकीय देखरेखीखाली असणारे सक्रीय रुग्ण केवळ 33.27%किंवा सुमारे एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या एक तृतीयांश आहेत असे डॉ हर्ष वर्धन यांनी सांगितले. भारतातला मृत्यू दर घटत असून सध्या हा दर 2.18%आहे, जगातल्या सर्वात कमी मृत्यू दरापैकी हा एक दर असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतातल्या रुग्णांसंदर्भात बोलताना, एकूण सक्रीय रुग्णांपैकी केवळ 0.28% रुग्ण व्हेंटीलेटरवर, 1.61% रुग्णांना आयसीयू प्रणालीची आवश्यकता तर 2.32% रुग्ण ऑक्सिजन प्रणालीवर असल्याचे डॉ हर्ष वर्धन म्हणाले. भारतात चाचण्यांची क्षमता झपाट्याने वाढत असून 1331 प्रयोग शाळांच्या माध्यमातून (911 सरकारी प्रयोगशाळा आणि 420 खाजगी प्रयोगशाळा) गेल्या 24 तासात विक्रमी 6,42,588 चाचण्या करण्यात आल्या. यामुळेआतापर्यंतच्या चाचण्यांची एकूण संख्या 1.88 कोटी हून अधिक झाली आहे.
पीपीई, मास्क, व्हेंटीलेटरआणि एचसीक्यू सारख्या औषधांच्या देशांतर्गत उत्पादन वाढीबाबतही मंत्री गटाला माहिती देण्यात आली. राज्ये/ केंद्र शासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थाना 268.25 लाख एन95 मास्क, 120.40 लाख पीपीई आणि 1083.77 लाख एचसीक्यू गोळ्याचे वितरण करण्यात आले.
राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ सुजित के सिंग यांनी जगातल्या रुग्ण संख्या जास्त असलेल्या पहिल्या दहा देशातले दैनंदिन रुग्ण, मृत्यू याबाबत जागतिक तुलनात्मक सादरीकरण केले.भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 64.54% असून दिल्लीचा दर सर्वोच्च 89.08% आहे, त्यानंतर हरियाणा (79.82%).कर्नाटकचा हा दर सर्वात कमी म्हणजे 39.36%. आहे. देशातल्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या प्रतिबंधित क्षेत्रातल्या सक्रीय रुग्णांबाबत मंत्री गटाला माहिती देण्यात आली. एनसीडीसीच्या संचालकांनी, 12 राज्यातल्या (महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, तेलंगण, बिहार, राजस्थान आणि आसाम) वाढीच्या दराबाबत, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्या चाचण्यांची संख्या आणि त्यांचा पॉझिटीव्हीटी दर,आणि सर्वोच्च रुग्णसंख्या असलेल्या 20 जिल्ह्याबाबत आणि जिल्ह्यातल्या प्रतिबंधित क्षेत्रातले सक्रीय रुग्ण आणि मृत्यू याबाबत मंत्री गटाला माहिती दिली.
रुग्णांची संख्या जास्त असणाऱ्या जिल्ह्यात/शहरात तसेच अलीकडच्या काळात रुग्णांच्या संख्येत वाढ झालेल्या पुणे, ठाणे, बेंगळुरू, हैदराबाद शहरांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
इतर अपडेट्स:
विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांन डीबीटी म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि सीएसआयआर यांनी संयुक्तपणे 1000 पेक्षा जास्त ‘सार्स-सीओव्ही-2 व्हायरल जीनोम’चे अनुक्रम बनवले असल्याची माहिती दिली. अशा प्रकारे केलेला हा देशातला सर्वात मोठा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या संशोधन आणि कार्यामुळे कोविड-19 महामारीमुळे प्रचलित झालेला प्रचंड ताण तसेच इतर गोष्टी समजण्यासाठी मदत होणार आहे. तसेच याची कोविड आजाराचे निदान करणे, औषधोपचार करणे आणि लस तयार करणे यासाठी महत्वाची मदत होणार आहे, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
कोल इंडियाच्या कर्मचारी वर्गापैकी एखाद्याचे निधन जर कोविड-19 मुळे झाले तर हा मृत्यू अपघाती मानण्यात येवून कर्तव्य बजावताना झालेल्या अपघाती मृत्यूच्या प्रकरणामध्ये कर्मचा-यांवर अवलंबून असलेल्या नातेवाइकांना जे आर्थिक लाभ दिले जातात, ते सर्व देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. मंत्री जोशी एक दिवसाच्या झारखंड दौ-यावर आले होते, त्यावेळी त्यांनी रांची येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद येसो नाईक यांनी राष्ट्रीय आयुष अभियानाच्या केंद्र पुरस्कृत योजनेचा आणि आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्राच्या परिचालनाचा आढावा घेण्यासाठी सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य / आयुष मंत्र्यांच्या वेबिनारचे अध्यक्षपद भूषवले. राज्य वार्षिक कृती योजना, उपयोग प्रमाणपत्रे, फिजिकल आणि आर्थिक प्रगती अहवाल, थेट लाभ हस्तांतरण संबंधित माहिती मंत्रालयाला ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी नाईक यांनी राष्ट्रीय आयुष अभियानासाठी समर्पित वेब पोर्टल सुरु केले. आयुष मंत्रालयाच्या या उपक्रमामुळे सरकारच्या धोरणानुसार माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन पारदर्शकता येईल आणि काम करणे सुलभ होईल. आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रे स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांसह 4 प्रकाशनेही त्यांनी जारी केली.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे स्मार्ट इंडिया हॅकाथॉन या सॉफ्टवेअर निर्मितीच्या स्पर्धेद्वारे नागरी समस्यांवर विद्यार्थ्यांद्वारे समाधान शोधले जाते. यावर्षी स्मार्ट इंडिया हॅकाथॉनच्या सॉफ्टवेयर आवृत्तीचे उद्घाटन जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथे होणार आहे . या महाविद्यालयाची सदर स्पर्धेसाठी एक नोडल केंद्र म्हणून निवड झाली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास अंतर्गत नवोन्मेष सेल कडुन 3 समस्यांसाठी 106 स्पर्धक असलेले एकूण 16 संघ सदर स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. प्रत्येक समस्येच्या निराकरणासाठी 1 लाख रुपयांचे बक्षिस राहणार आहे. 1 ऑगस्ट 2020 रोजी जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात होणा-या या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष जी.एच.आर.सी. शैक्षणिक संस्थे चे अध्यक्ष सुनील रायसोनी राहणार आहेत. यावर्षी, कोविड-19 च्या साथीमुळे सदर स्पर्धेचे सॉफ्टवेयर संस्करण ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे.
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्रात गुरुवारी आतापर्यंतचे एका दिवसात सर्वाधिक 11,147 रुग्ण आढळून आले असून यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 4.11 लाख इतकी झाली आहे. राज्यात 1.48 लाख सक्रिय रुग्ण असून गेल्या 24 तासात 8,860 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत पुन्हा एकदा एक हजारापेक्षा जास्त 1,208 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. शहरात सध्या 20,158 सक्रिय रुग्ण आहेत. पुणे महानगरपालिका आणि पुण्यात 1,889 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील गंभीर परिस्थिती असलेल्या 5 जिल्ह्यांपैकी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई असे तीन जिल्हे महाराष्ट्रातील आहेत तर चेन्नई आणि बंगळुरू हे उर्वरित दोन जिल्हे आहेत.
*****
G.Chippalkatti/S.Tupe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com