PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 11 NOV 2020 5:52PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई 11 नोव्हेंबर 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

जलसंवर्धनासाठी ‘लोक चळवळ’ उभी करण्याची साद घालत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी, या कामी यश मिळविण्यासाठी जनतेच्या सहभागाचे महत्त्व आज अधोरेखित केले. भारत हा खंडप्राय  देश असून जनतेच्या सहभागाशिवाय येथे कोणतीही गोष्ट यशस्वी होऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले. ते आज दुसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कार सोहळ्याच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला आभासी माध्यमातून संबोधित करत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 13 नोव्हेंबर 2020 ला, पाचव्या आयुर्वेद दिनानिमित्त, गुजरातच्या जामनगर येथे आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्था-ITRA आणि राजस्थानच्या जयपूर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्था- NIA चे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्‌घाटन होणार आहे. एकविसाव्या शतकात आयुर्वेदाचा जागतिक स्तरावर विकास करण्याच्या कार्यात या संस्थांचे मोठे योगदान असेल, अशी अपेक्षा आहे.

शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) मंडळातल्या देशांच्या सरकारप्रमुखांच्या 20 व्या शिखर परिषदेचे  व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 10 नोव्हेंबर, 2020 रोजी आयोजन करण्यात आले होते. कोविड-19 महामारीचा उद्रेक असतानाही या परिषेदेचे आयोजन करण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे या परिषदेमध्ये केलेल्या भाषणात अभिनंदन केले. संपूर्ण विश्वाला महामारीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा सामाजिक आणि आर्थिक संकटाच्या काळामध्ये संघटनेने बहुउपयोगित्वाचा विचार करून सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, हा मुद्दा पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केला.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

डॉ हर्ष वर्धन यांनी ब्रिक्स परिषदेत भारताचा कोविड विरूद्धचा लढा अधोरेखित केला : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन आज  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ब्रिक्स आरोग्य मंत्री  परिषदेत सहभागी झाले. “सर्वांना, उपलब्ध होणारी, योग्य व परवडणारी आरोग्य सेवा पुरविण्यासाठी विकेंद्रित परंतु एकात्मिक यंत्रणा आमच्या कोविड19 विरुद्धच्या लढ्यामागची प्रेरक शक्ती होती,” असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ब्रिक्स मंचामध्ये सांगितले.

जागतिक महामारीशी लढा एकत्रितपणे देताना भारताने अनेक मैलाचे टप्पे पार केले. भारतातील सक्रिय रूग्णांची संख्या 106 दिवसांत प्रथमच 5 लाखांहून कमी झाली. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आज 4,94,657 इतकी आहे. 28 जुलैला ही संख्या 4,96,988 होती. उपचाराधीन रुग्णसंख्येचे प्रमाण एकूण कोविडबाधितांच्या संख्येच्या 5.73% आहे.

यावरून देशातील उपचाराधीन रुग्णसंख्येतील घसरणीतील सातत्य स्पष्ट होते. जगातील अनेक देशांमध्ये नवीन रुग्णसंख्येचा आकडा वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर हे लक्षणीय आहे.

हे अजोड यश म्हणजे केंद्रसरकारच्या शाश्वत, वर्गीकृत आणि अचूक धोरणे, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेली परिणामकारक अंमलबजावणी, वैद्यकीय व्यावसायिक तसेच कोविड 19 योदध्यांनी दिलेली समर्पित आणि निस्वार्थ सेवा याचाच परिपाक आहे.

27 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रिय रुग्ण 20,000 पेक्षा कमी आहेत.

फक्त 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण 20,000 पेक्षा जास्त आहे; फक्त दोन राज्यांमध्ये (केरळ  आणि महाराष्ट्र) सक्रिय रुग्णसंख्या 50,000 पेक्षा जास्त आहे.

गेल्या 24 तासात 44,281 नवे रुग्ण नोंदवले गेले, तर उपचाराधीन रुग्णसंख्या 50,326  होती. सलग 39व्या दिवशी बरे होणाऱ्यांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे.

म्हणजे बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे तसेच एकूण रोगमुक्त आणि उपचाराधीन यांच्या संख्येतील तफावतही वाढत आहे.

एकूण रोगमुक्तांच्या संख्येच्या आकड्याने 80 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आजमितीस रोगमुक्तांची एकूण संख्या 80,13,783 आहे. रोगमुक्त आणि उपचाराधीन यांच्या संख्येतील तफावत 75,19,126 एवढी जास्त आहे तर रुग्ण बरे होण्याचा दर 92.79% आहे.

अजून एक नोंदवण्याजोगा मैलाचा दगड म्हणजे निदान चाचण्यांनी 12 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. देशात गेल्या 24 तासात 11,53,294 निदान चाचण्या झाल्या.

बाधितांच्या दैनंदिन संख्येत घट येण्याचे कारण म्हणजे निदान चाचण्यांची वाढवलेली संख्या होय.

मोठ्या प्रमाणावरील निदान चाचण्यांमुळे लोकसंख्येतील बाधितांचे प्रमाण लक्षात येते, जेणेकरून बाधित नसलेल्यांना संसर्ग न होउ देण्याची खबरदारी घेता येते.

दैनंदिन नवी रुग्णसंख्या 50,000 हून कमी झाली आहे.

नव्याने रोगमुक्त झालेल्यांपैकी 77% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

महाराष्ट्रात दैंनदिन रोगमुक्तांची संख्या ही 6,718 एवढी नोंदवली गेली तर केरळमध्ये ती त्याखालोखाल 6,698 एवढी तर दिल्लीत 6,157 एवढी नोंदवली गेली.

नव्या नोंद झालेल्या रुग्णांपैकी 78% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

एका दिवसात नोंद झालेली रुग्णसंख्या दिल्लीत सर्वाधिक म्हणजे 7,830 तर त्या खालोखाल केरळात 6,010 एवढी आहे,

कोविड मृत्यूंपैकी 79% 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

गेल्या 24 तासात 512 मृत्यू नोंदवले गेले. मृत्यूदर 1.48% असून तो कमी कमी होत आहे.

महाराष्ट्रातील 110 ही सर्वाधिक मृत्यूसंख्या आहे त्यापाठी दिल्ली आणि पश्चिम बंगालात अनुक्रमे 83 व 53 मृत्यू झाले.

इतर अपडेट्स:

महाराष्ट्र अपडेट्स

महाराष्ट्रात मंगळवारी 3,791 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली यामुळे राज्यात एकूण रुग्णसंख्या 17.27 लाख इतकी झाली आहे. जास्तीत जास्त रुग्ण बरे होत असल्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1 लाखपेक्षाही कमी झाली आहे. राज्यात आता उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 92,461 झाली आहे. मुंबईत 535 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली असून शहरात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 16,374 झाली आहे. दरम्यान, कोविड लसीकरणासाठी आरोग्य कर्मचार्‍यांचा डेटा अपलोड करण्याकरीता मोबाईल अॅप कोविन सुरू करण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. आरोग्य सेव क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका, स्वॅब नमुने गोळा करणारे तसेच पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाईल. कोव्हिन अ‍ॅप कोडींगच्या अंतिम टप्प्यात असून ते लवकरच सुरू केले जाईल अशी माहिती केंद्राने सोमवारी दिली आहे.

RT/ST/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1672045) Visitor Counter : 128