पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ईशान्य भारताच्या कायापालटावर आधारित लेख पंतप्रधानांनी सामायिक केला

Posted On: 28 MAY 2025 3:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 मे 2025

केंद्रीय दूरसंचार मंत्री तसेच ईशान्य प्रदेश मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी लिहिलेला लेख आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला. ईशान्य भारत आता देशाच्या सीमेवरील प्रदेश राहिलेला नसून तो आघाडीवरील प्रदेश झाला आहे.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे:

"ईशान्य भारत हा आता देशाच्या सीमेवरील प्रदेश राहिलेला नसून तो आघाडीवरील प्रदेश झाला आहे. व्यापार, जोडणी यांतील तसेच विकसित भारतासाठी 30 ट्रिलीयन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेची संकल्पना साकार करण्यातील धोरणात्मक केंद्र म्हणून या भागाच्या झालेल्या उदयाचे केंद्रीय मंत्री @JM_Scindia यांनी त्यांच्या लेखात तपशीलवार वर्णन केले आहे. त्यावर एक नजर नक्की टाका!"


S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2131985)