PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 25 AUG 2020 7:44PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 25 ऑगस्ट  2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील महाड, रायगड येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानी बद्दल दुःख व्यक्त केले आहे.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

टेस्ट, ट्रॅक अँड ट्रीट यावर लक्ष केंद्रित करून भारताने आतापर्यंत सुमारे 7.7 कोटी संचयी कोविड-19 नमुन्यांची चाचणी केली आहे. दररोज चाचण्यांची संख्या वेगाने वाढविण्याच्या भारताच्या संकल्पानुसार आतापर्यंतची संचयी चाचणी 3,68,27,520 वर पोहोचली आहे.

प्रति दशलक्ष चाचण्यांचे प्रमाण वाढत जाऊन थेट 26,685 पर्यंत पोहोचले असून, गेल्या 24 तासात 9,25,520 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

वेळेवर रुग्णांची ओळख, त्वरित विलगीकरण आणि प्रभावी उपचार या दिशेने पहिले पाऊल टाकत, मोठ्या प्रमाणावरील चाचणी प्रक्रियेमुळे संक्रमणाचा प्रसार मर्यादित राहिला आहे.

पुण्यात पहिली चाचणी प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर, भारतातील चाचणी प्रयोग शाळांचे जाळे सातत्याने विस्तारत राहिले आहे, सध्या 1524 प्रयोगशाळा आहेत. 986 प्रयोगशाळा या सरकारी क्षेत्रात आणि 538 प्रयोगशाळा खासगी क्षेत्रात आहेत. यामध्ये समाविष्ट होणाऱ्यांमध्ये :

  • रिअल टाइम रॅपिड टेस्ट पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा 787 :  (शासकीय : 459 + खासगी :  328)
  • ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 619 (शासकीय :  493 + खासगी : 126)
  • सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा 118 : (शासकीय :  34 + खासगी 84)

केंद्र सरकार आणि राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी राबवलेल्या सामुहिक आणि धोरणात्मक उपाययोजनांचे योग्य परिणाम दिसून येत आहेत. दिवसभरातील कोविड रोगमुक्तीचा नवा उच्चांक आज भारताने नोंदवला आहे. 66,550 कोविडबाधित गेल्या 24 तासांमध्ये रोगमुक्त होऊन रुग्णालयातून बाहेर पडले आहेत. अग्रक्रमाने चाचण्या, सर्वंकष ट्रॅकिंग आणि परिणामकारक औषधोपचार यामुळे रोगमुक्तांचा एकूण आकडा 24 लाखांना पार करून गेला आहे (24,04,585)

इतर अपडेट्स:

महाराष्ट्र अपडेट्स :

एनईईटी/जेईई परीक्षा पुढे ढकलण्याचा मुद्दा दिवसेंदिवस जोर धरत आहे. पुढील महिन्यात एनईईटी/जेईई परीक्षा घेण्याच्या केंद्राच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. अनेक देशांप्रमाणेच जानेवारीपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत शासन विचार करू शकते, असे त्यांनी सुचवले आहे.

 

BG/ST/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1648580) Visitor Counter : 238