गृह मंत्रालय

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे घातलेल्या प्रवास निर्बंधांमुळे सध्या भारतात राहत असलेल्या विदेशी नागरिकांसाठी 30 एप्रिल 2020 पर्यंत कॉन्सुलर सेवांना मंजुरी

Posted On: 13 APR 2020 4:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2020

 

कोविड-19 च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी घातलेल्या प्रवास निर्बंधांमुळे सध्या भारतात राहत असलेल्या विदेशी नागरिकांसाठी 30 एप्रिल 2020 पर्यंत कॉन्सुलर सेवांना, केंद्रीय गृह मंत्रालयाने, 28 मार्च 2020 ला अनुकंपा तत्वावर मंजुरी दिली आहे. जनतेमधला संभ्रम दूर करण्यासाठी ही माहिती देण्यात येत आहे. (https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1613895)
जगातल्या अनेक भागात कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे भारतीय प्रशासनाने घातलेल्या प्रवास निर्बंधांमुळे भारतात अडकलेल्या विदेशी नागरीकांचा नियमित व्हिसा, ई व्हिसा, तसेच ज्यांच्या व्हिसाची मुदत संपली असेल किंवा 01.02.2020 (मध्यरात्र) ते 30.04.2020 (मध्यरात्र) या काळात संपणार असेल, त्यांना या विदेशी नागरीकानी, ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, 30 एप्रिल 2020 (मध्यरात्र) पर्यंत, अनुकंपा तत्वावर, मुदतवाढ देण्यात येईल.

 

 


G.Choppalkatti/N.Chitale/D.Rane
 



(Release ID: 1613956) Visitor Counter : 201