पंतप्रधान कार्यालय
आसाममध्ये भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या स्थापनेबद्दल पंतप्रधानांनी आसामच्या जनतेचे केले अभिनंदन
Posted On:
20 AUG 2025 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2025
आसाममध्ये भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) स्थापन झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामच्या जनतेचे अभिनंदन केले आहे.
भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या स्थापनेमुळे शिक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विस्तार होईल आणि देशभरातील विद्यार्थी तसेच संशोधक इथे येऊ लागतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या आसाममध्ये भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या स्थापनेबद्दल X या समाज माध्यमावर सामायिक केलेल्या संदेशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिसाद देताना म्हटले आहे ;
'आसामच्या जनतेचे अभिनंदन! राज्यात भारतीय व्यवस्थापन संस्थेची स्थापना झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विस्तार होईल आणि देशभरातील विद्यार्थी तसेच संशोधक इथे येऊ लागतील'.
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2158742)