शिक्षण मंत्रालय

'सीबीएसई' परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी 3,000 सीबीएसई संलग्न शाळा ‘मूल्यमापन केंद्र’म्हणून सुरु करण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाची मंजुरी


या परवानगीमुळे 1.5 कोटी उत्तरपत्रिकांचे लवकरात लवकर मूल्यमापन करणे शक्य होईल- रमेश पोखरीयाल ‘निःशंक’

Posted On: 09 MAY 2020 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9  मे 2020

केंद्रीय गृहमंत्रालयाने सीबीएसई- म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या देशभरातील 3,000 शाळा मूल्यमापन केंद्र म्हणून सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. सीबीएसई द्वारे घेतल्या गेलेल्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे वेळेत मूल्यमापन होऊन निकाल लावता यावा, या दृष्टीने ही परावानगी देण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल ‘निःशंक’ यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, ही मंजुरी दिल्याबद्दल गृहमंत्रालयाचे आभार मानले आहेत. देशभरातील 3,000 सीबीएसई संलग्न शाळा केवळ पेपर तपासणीच्या मर्यादित कामांसाठी सुरु केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

या निर्णयामुळे 1.5 कोटी उत्तरपत्रिकांचे लवकरात लवकर मूल्यमापन करणे शक्य होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मात्र, बोर्डाचे उर्वरित पेपर्स झाल्यावरच या दोन्ही परीक्षांचे निकाल लावले जातील. (हे पेपर्स एक जुलै ते 15 जुलै दरम्यान नियोजित आहेत.)

 

गृहमंत्रालयाचे आदेश बघण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

U.Ujgare/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1622579) Visitor Counter : 164