PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
देशात दररोज एक लाख PPE सूट आणि N-95 मास्क तयार केले जात आहेत : आरोग्य मंत्रालय
कोविड-19 शी लढण्यासाठी 1.24 कोटी मनुष्यबळ उपलब्ध असून त्यात सातत्याने वाढ होत आहे
Posted On:
25 APR 2020 7:38PM by PIB Mumbai
(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from field offices, and Fact checks undertaken by PIB)
नवी दिल्ली-मुंबई, 25 एप्रिल 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमझानच्या पवित्र महिन्याच्या प्रारंभानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. "रमझान मुबारक! प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी, कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो. हा पवित्र महिना सर्वांच्या जीवनात विपुल दया, सुसंवाद आणि करुणा घेऊन येवो. कोविड -19 विरुद्ध सुरु असलेल्या आपल्या लढाईत आपल्याला निर्णायक विजयश्री मिळो आणि अधिक आरोग्यसंपन्न अशा पृथ्वीची निर्मिती आपल्याला करता येवो", असे पंतप्रधानांनी म्हटले आहे
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
कोविड-19 वर मात करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय मंत्रिगटाची 13 वी बैठक आज नवी दिल्लीत निर्माण भवन इथे झाली. आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध खात्यांचे मंत्री, संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत, नीती आयोगाचे प्रमुख अमिताभ कांत, कोविड बाबत स्थापन करण्यात आलेल्या अधिकारपाप्त गटांचे प्रमुख आणि काही विभागांचे सचिव उपस्थित होते.
कोविड-19 च्या सद्यस्थिती बाबतची सविस्तर माहिती आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी सुरु असलेल्या उपाययोजना यांचे एक सविस्तर सादरीकरण यावेळी मंत्रिगटासमोर करण्यात आले.सर्व जिल्ह्यांना कोविडचा सामना करण्यासाठी आपली आपत्कालीन योजना अधिक बळकट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले. कोविड समर्पित रुग्णालयांची सर्व राज्यांतील स्थिती, अलगीकरण खाटा/ कक्ष, PPE सूट, N-95 मास्क, औषधे, व्हेन्तिलेटर, ऑक्सिजन सिलेंडर या सगळ्याच्या उपलब्धतेविषयीची माहिती, यावेळी देण्यात आली. देशांतर्गत उत्पादक कंपन्यां PPE सूट, N-95 मास्कचे उत्पादन करत असून ही सगळी सामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. आता देशात दररोज एक लाख PPE सूट आणि N-95 मास्क तयार केले जात आहेत. सध्या देशात PPE चे 104 उत्पादक असून तीन कंपन्या N-95 मास्क बनवत आहेत. त्याशिवाय, देशातच व्हेंटीलेटर्सची निर्मिती देखील सुरु असून नऊ उत्पादक कंपन्यांना 59,000 व्हेंटीलेटर्स बनवण्याची ऑर्डर देण्यात आली आहे.
मंत्री गटाने यावेळी, चाचण्या करण्याचे धोरण आणि चाचण्यांच्या किट्सची उपलब्धता यांचाही आढावा घेतला. तसेच हॉटस्पॉट आणि क्लस्टर व्यवस्थापन धोरणाचाही आढावा घेतला. मंत्री गटाला सध्या सरकारी आणि खाजगी प्रयोगशाळात होत असलेल्या चाचण्यांची माहिती देण्यात आली.
कोविड संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या विविध उच्चस्तरीय अधिकारप्राप्त गटांकडे दिल्या गेलेल्या जबाबदाऱ्या आणि त्यांची आतापर्यतची कामे याविषयीची सादरीकरणे अमिताभ कांत, अरुण कुमार पांडा आणि प्रदीप खरोला यांनी यावेळी केली. सध्या देशभरात सुमारे 92,000 स्वयंसेवी संस्था आणि इतर विविध सरकारी-खाजगी संस्था स्थलांतरीत मजूर, कामगार आणि गरिबांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी कार्यरत आहेत. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारे या संस्थांना निधी देऊन मदत करत असून त्यांना स्वस्त दरात धान्यही उपलब्ध करुन दिले जात आहे.
त्याशिवाय, देशभरातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, NSS, NYK, NCC यांचे स्वयंसेवक यांची नेमकी आकडेवारी आणि माहितीही या बैठकीत देण्यात आली. ही सगळी माहिती संकलित करुन सर्व राज्ये, जिल्हा आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे, जेणेकरुन गरज पडल्यास, त्यांना या मनुष्यबळाची मदत घेता येईल.
सध्याच्या आकडेवारीनुसार,कोविड-19 शी लढण्यासाठी 1.24 कोटी मनुष्यबळ उपलब्ध असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. मनुष्यबळ कौशल्याच्या वैशिष्ट्यानुसार त्यांचे वेगवेगळे गट तयार करण्यात आले आहेत. या सर्व गटांची माहिती तसेच प्रत्येक जिल्ह्यातील नोडेल अधिकाऱ्यांनी माहितीदेखील या https://covidwarriors.gov.in/default.aspx संकेतस्थळाच्या डेशबोर्ड वर उपलब्ध आहे.
त्याशिवाय, https://diksha.gov.in/igot/ या पोर्टलवर देखील ही माहिती बघता येईंल. या सर्व कोविड योद्ध्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिले जात आहेत. आरोग्य मंत्रालयाचे संकेतस्थळ आणि iGOT प्रशिक्षण पोर्टलवरुन हे प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत 10 लाख व्यक्तींना हे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे.
कोविडपासून देशाचे संरक्षण करण्याच्या या लढाईत सार्वजन ज्या समर्पण भावनेने काम करत आहेत, त्या सर्वांचे डॉ हर्षवर्धन यांनी कौतुक केले. कोविडच्या रुग्णांमध्ये असलेला भयगंड आणि त्यांना तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणारी भेदभावाची वागणूक यावर त्वरित उपाययोजना करण्याची गरज असून,त्यासाठी संसर्गजन्य आजार नियंत्रण कायदा 1897 मध्ये दुरुस्ती करणारा अध्यादेश नुकताच सरकारने जारी केला आहे, अशी माहिती डॉ हर्षवर्धन यांनी दिली ही केवळ त्यांची लढाई नाही, तर आपल्या सर्वांची एकत्रित लढाई आहे. त्यांच्या कामाचा आदर ठेवण्यासोबतच, त्यांची सुरक्षितता आणि प्रतिष्ठा अबाधित राहील याचीही आपण एक देश म्हणून काळजी घ्यायला हवी, असे, हर्षवर्धन म्हणाले.
सध्या देशात कोविडचा मृत्यूदर सुमारे 3.1% तर रुग्ण बरे होण्याचा दर 20 टक्के इतका आहे, अशी माहिती मंत्रिगटाला देण्यात आली. अनेक देशांच्या तुलनेत ही परिस्थिती चांगली असून हा लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम आहे, असे त्यांनी सांगितले. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी सध्या 9.1 दिवस इतका आहे.
आतापर्यंत, देशभरात कोविडचे, 5,062 रुग्ण बरे झाले आहेत. कालपासून 1429 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात कोरोनाचे एकूण 24,506 रुग्ण आहेत. आरोग्य सचिव प्रीती सुदान यांच्यासह मंत्रीगटातील सर्व विभागांचे मुख्य सचिव आणि इतर महत्वाच्या क्षेत्रातील अधिकारी व प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
इतर अपडेट्स :
- लॉक डाऊन संदर्भातल्या एकत्रित सुधारित मार्गदर्शक तत्वांमधे सुधारणा करत दुकाने खुली ठेवण्याबाबत, केंद्रीय गृहमंत्रालयाने काल आदेश जारी केला आहे. हॉटस्पॉट प्रतिबंधीत क्षेत्रात दुकाने बंदच राहणार
- एकल मॉल आणि बहुविध ब्रान्ड मॉल वगळता विशिष्ट श्रेणीतली दुकाने सुरु करण्यासाठी परवानगी देण्यासंबंधात केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना आदेश जारी
- कोविड-19 च्या रुग्णांची तपसणी न करता, त्याच क्षणी PCR चाचणीद्वारे निदान करणारे उपकरण आयआयटी दिल्लीच्या संशोधक शास्त्रज्ञांनी विकसित केले असून, आज या सर्व चमूचा मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ICMR ने मान्यता दिलेल्या या नव्या चाचणी कीटमुळे आरोग्य सेवांना मदत होऊन कोविड च्या लढ्यात मोठे योगदान मिळेल- मनुष्यबळ विकासमंत्री
- इंटरनॅशनल ॲडव्हान्स रिसर्च सेंटर फॉर पावडर मेट्रोलॉजी अँड न्यू मटेरियल्स (ARCI), विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सहाय्यक संशोधन आणि विकास केंद्र (DST), भारत सरकार आणि हैदराबाद विद्यापीठ (UOH) यांच्या संयुक्त विद्यमाने, मेकिंग इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या सहयोगाने अल्ट्राव्हायोलेट प्रारणावर आधारित निर्जंतुकीकरण ट्रॉलीचा उपयोग कोविड-19 च्या रुग्णालय परिसरात जलद स्वच्छतेसाठी करता येईल.
- दीर्घ कालावधीसाठी मास्क लावल्यामुळे वापरकर्त्यांना श्वास घेण्यास त्रास तसेच श्वसन संस्थेच्या कार्यात अडथळा निर्माण होण्यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी लखनौच्या एनबीआरआय अर्थात राष्ट्रीय वनस्पतीशास्त्र संशोधन संस्थेने अनेक वनौषधी द्रव्यांच्या मिश्रणातून चोंदलेले नाक मोकळे करणारा फवारा विकसित केला आहे.
- कोविड-19 आपत्कालीन परिस्थितीत देशवासीयांना या आजाराचा सामना करण्यासाठी गरजेच्या वस्तू पुरवून मदत करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, रोटरी क्लब ऑफ दिल्ली हेरिटेज, जवळपास 50,000 मुखाच्छादक मास्कचे विनामूल्य वाटप करीत आहे. पुनर्वापरायोग्य असे हे मास्क मोठ्या प्रमाणावर वाटप करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आले आहेत. पीआयबी अर्थात पत्र सूचना कार्यालयाशी समन्वय साधून हे काम करण्यात येत आहे.
- कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे उपक्रम आणि विविध विभागांनी हाती घेतलेल्या उपक्रमांचा केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्य मंत्री संजय धोत्रे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. हाती घेतलेल्या विविध उपायांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. सोशल डीस्टन्सिंगच्या सर्व निकषांचे पालन करत देशाच्या सेवेप्रती स्वतःला वाहून घेण्याचे आवाहन त्यांनी या विभागांना केले.
- कोविड-19 च्या लढ्यात आपापले राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात परिस्थिती नियंत्रणात ठेवून कोरोनाचे व्यवस्थापन करण्यात यशस्वी ठरल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो”, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हंटले आहे. कोविडविरुध्दच्या लढ्याचे व्यवस्थापन आणि सर्व राज्यांमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज त्यांनी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
- केंद्रीय गृह मंत्रालयाने 20 एप्रिल 2020 पासून अ-प्रतिबंधित क्षेत्रात दिलेल्या सवलतीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण विकास, पंचायती राज आणि कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (पीएमएवाय-जी), प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (पीएमजीएसवाय) आणि राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन (एनआरएलएम) अंतर्गत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी राज्यांचे ग्रामीण विकास मंत्री आणि संबधित अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती.
- कोविड-19 मुळे घालण्यात आलेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीत देशात विमान, रेल्वे, राज्य मार्ग यामार्फत होणारी प्रवासी वाहतूक पूर्णतः थांबल्याने अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळीच्या व्यवस्थापनात अडथळे उत्पन्न झाले. सदर आपत्कालीन स्थितीत चौकटीबाहेरचा विचार करण्याचे आवाहन केंद्रीय संदेशवहन, इलेकट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी टपाल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केले.
- शहरातील कोविड -19 च्या परिस्थितीचा मागोवा घेण्यासाठी आणि त्यावर नजर ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत कोविड -19 वॉर रूमची स्थापना करण्यात अली आहे. स्मार्ट शहर अभियानांतर्गत, कार्यवाहीयोग्य दृष्टिकोन विकसित करण्यासाठी आणि त्वरित निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी माहिती मिळविणे, तिचे संकलन करणे आणि संकलित माहितीचे विश्लेषण करण्यासाठी तंत्रज्ञानाचे उपाय या वॉर रूममध्ये अवलंबिले गेले आहेत. वॉर रूममध्ये पुढील डॅशबोर्ड कार्यरत आहेत.
- देशातल्या काही जिल्ह्यात लॉक डाऊनच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे वृत्त असून अशा घटनांमुळे आरोग्याला तसेच कोविड-19 च्या प्रसाराचाही धोका निर्माण होत असून जनतेसाठी हे अपायकारक आहे. आरोग्य व्यावसायिकांवर हल्ला, पोलिसांवर हल्ला, बाजारपेठांमधे सोशल डीस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लघन, विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी विरोध अशा घटनातून लॉक डाऊनचा भंग करण्यात येत आहे. या संदर्भात केंद्र सरकारने आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथके स्थापन केली आहेत.
- नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप सिंग पुरी यांनी कोविड-19च्या काळात हवाई वाहतूक क्षेत्रातील व्यावसायिक आणि संबंधितांनी लाईफलाईन उडानअंतर्गत, जीवरक्षक औषधे आणि अत्यावश्यक सामग्रीचा देशभरातील नागरिकांना पुरवठा करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांची प्रशंसा केली. आतापर्यंत लाईफलाईन उडानअंतर्गत सुमारे 3,43,635 किमी अंतर कापण्यात आल्याची माहिती त्यांनी ट्वीट वरून दिली आहे.
- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून, कोविड-19 साथीच्या आजाराच्या काळात राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत, (एनटीईपी) जनहितार्थ सर्व सुविधा सुरु राहतील तसेच या रुग्णांचे विनाअडथळा निदान आणि काळजी घेण्यात येत आहे याची खात्री करून घ्यायला सांगितले आहे.
महाराष्ट्र अपडेट्स
ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण आणि वैद्यकीय तपासणी तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर देण्यात यावा. जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशा सुचना केंद्रीय पथकाचे प्रमुख अतिरिक्त सचिव मनोज जोशी यांनी केल्या.
PIB FACTCHECK
* * *
RT/MC/SP/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1618252)
Visitor Counter : 208