पंतप्रधान कार्यालय

कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन याचे केले अभिनंदन

Posted On: 16 FEB 2024 9:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 फेब्रुवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन याचे कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी घेतल्याबद्दल अभिनंदन केले.

पंतप्रधान म्हणाले की, अश्विनची कारकीर्द आणि त्यांनी मिळवलेले यश हे त्याच्या कौशल्य आणि चिकाटीचे फळ आहे.

पंतप्रधानांनी एक्स  वर पोस्ट केले:

क्रिकेट कसोटी मध्ये 500 बळी घेण्याच्या अभूतपूर्व  कामगिरीबद्दल रविचंद्रन अश्विन याचे अभिनंदन! त्याची कारकीर्द आणि त्यांनी मिळवलेले यश हे त्याच्या कौशल्य आणि चिकाटीचे फळ आहे. भविष्यात यशाची शिखरे सर करण्यासाठी त्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा”

 

* * *

S.Kane/V.Yadav/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2006704) Visitor Counter : 68