पंतप्रधान कार्यालय

आयुष्मान भारत योजनेला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पंतप्रधानांनी केला शेअर

Posted On: 06 OCT 2022 4:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 ऑक्‍टोबर 2022

 

आयुष्मान भारत योजनेला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला आहे. सर्व भारतीय नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच पुरवणाऱ्या या योजनेचे लाभ नागरिकांना देशभरात कुठेही मिळू शकतात, असे मतही पंतप्रधानांनी नोंदवले आहे.

आयुष्मान भारत योजना गरिबांसाठी वरदान ठरली आहे, अशा आशयाचे एका नागरिकाचे ट्वीट शेअर करत, पंतप्रधानांनी त्याला प्रतिसाद दिला आहे--

“हे तर खरेच आहे. त्याचबरोबर, महत्वाचे म्हणजे या योजनेचे लाभ नागरिक देशभरात कुठेही घेऊ शकतात.”

 

* * *

M.Pange/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1865615) Visitor Counter : 170