आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतामध्ये सलग दुसऱ्या दिवशी 30 हजार कोविड रूग्णांची नोंद


कोविड-19 रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणामध्ये गेल्या दीड महिन्यांपासून दररोज वाढ

Posted On: 17 NOV 2020 1:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 17 नोव्हेंबर 2020

गेल्या दोन दिवसांपासून भारतामध्ये दररोज जवळपास 30,000 कोरोना बाधित नवीन रूग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे नवीन 29,163 रूग्ण आढळले. गेल्या सलग दहा दिवसापासून देशामध्ये दररोज 50,000पेक्षा कमी कोरोनाचे रूग्ण नोंदवले जात आहेत.

नागरिक आता कोविड होऊ नये म्हणून काळजी घेत असून, योग्य वर्तन करीत असल्याचे दिसून येत आहे. यूरोप आणि अमेरिका या देशांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोविडच्या दैनंदिन रूग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे.

कोविड आजारातून बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 40,791 कोरोनाचे रूग्ण बरे झाले. तर गेल्या 24 तासांमध्ये 29,163 जणांना कोविड झाल्याची नोंद आहे.

सरकारने संपूर्ण देशभर कोविड चाचण्या करण्याचे प्रमाण कायम ठेवले आहे. एका दिवसात देशामध्ये 12,65,907 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रूग्णांच्या संख्येमध्ये 7.01टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे.

देशामध्ये 4,53,401 कोविडचे सक्रिय रूग्ण आहेत. एकूण रूग्णांपैकी हे प्रमाण फक्त 5.11 टक्के आहे.

या आजारातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 82,90,370 आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता वाढले असून आज ते 93.42 टक्के झाले आहे.

गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या रूग्णांपैकी 72.87 टक्के रूग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत.

रूग्ण बरे होण्याचे प्रमाण केरळमध्ये सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. केरळमधील 6,567 कोरोना रूग्ण आता पूर्ण बरे झाल्याची नोंद आहे. त्याखालोखाल पश्चिम बंगालमधील 4,376 कोरोनाचे रूग्ण बरे झाले आहेत. तर दिल्लीमधील 3,560 कोरोनाचे रूग्ण बरे झाले आहेत.

देशातल्या 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नव्याने कोरोना झालेल्या रूग्णांचे प्रमाण 75.14 टक्के आहे.

दिल्लीमध्ये कालच्या एका दिवसामध्ये 3,797 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याखालोखाल पश्चिम बंगालमध्ये 3,012 जणांना कोरोना झाला आहे. केरळमध्ये 2,710 जणांना कोरोना झाला.

गेल्या 24 तासांमध्ये दिल्लीमध्ये कोरोना झालेल्या 99 रूग्णांना प्राण गमवावे लागले. हे प्रमाण 22.76 टक्के आहे. तर महाराष्ट्रामध्ये 60 जणांचा आणि त्याखालोखाल पश्चिम बंगालमध्ये 53 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला.

U.Ujgare/S.Bedekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1673407) Visitor Counter : 242