PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
10 AUG 2020 7:22PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 10 ऑगस्ट 2020
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001K2JX7TLS.png)
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/IMG-20200407-WA0004WW91CVWJ.jpg)
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0049MS7YPCS.png)
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006UBP92T1W.jpg)
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image00504O0YGA8.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अंदमान आणि निकोबार बेटांना मुख्य भूमीशी जोडणाऱ्या सबमरीन ऑप्टिकल फायबर केबलचे (समुद्र तळाशी टाकलेली केबल) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करून हा प्रकल्प राष्ट्राला अर्पण केला. या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांकडून 30 डिसेंबर 2018 रोजी पोर्ट ब्लेअर येथे करण्यात आली होती. या कनेक्टिव्हीटीमुळे आता बेटावर अनेक अमर्याद संधी उपलब्ध होतील असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. 2300 किलोमीटर्स सबमरीन केबल टाकण्याचे उद्दिष्ट ठेवणे आणि काम नियोजित लक्ष्याच्याआधीच पूर्ण करणे हे स्तुत्य असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
- भारतात कोविड रुग्ण बरे होण्याच्या दराने 1.5 दशलक्षाचा नवा विक्रमी टप्पा आज गाठला. परिक्षणाला अग्रक्रम, सर्वंकष ट्रॅकिंग आणि परिणामकारक उपचार यामुळे ही 15,35,743 रुग्णांची रिकव्हरी शक्य झाली. उत्तम रुग्णवाहिनी सेवा, आदर्श रुग्णसेवा आणि नॉन-इनवेजिव तऱ्हेने प्राणवायू पुरवठा यामुळेही अपेक्षित परिणाम साधता आले. गेल्या 24 तासात 54,859 एवढे रुग्ण बरे झाले. हा दिवसभराचा रिकवरी रेट आतापर्यंतचा सर्वात जास्त आहे. कोविड-19 रुग्ण बरे होण्याचा दर 70% जवळ पोहचला. बरे होणाऱ्यांची ही विक्रमी संख्या देशाची खरी रुग्ण संख्या कमी झाल्याचे दर्शवते. म्हणजेच एकूण बाधित रुग्णसंख्या 28.66% एवढीच आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या भारतात 9 लाखाहून जास्त असून ती गंभीर रुग्णांपेक्षा (6,34,945) लक्षणीयरीत्या जास्त आहे.
- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली राज्य/केंद्रशासितप्रदेशांबरोबर “ईसंजीवनी” आणि “ईसंजीवनीओपीडी” प्लॅटफॉर्म संबंधी आढावा बैठक झाली.टेलि -मेडिसिन सर्व्हिस प्लॅटफॉर्मवर 1.5 लाख दूरध्वनी-सल्लामसलती पूर्ण झाल्या. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, हे देखील उपस्थित होते. तामिळनाडूचे आरोग्यमंत्री डॉ.सी.विजय बास्कर वर्च्युअली सहभागी झाले. नोव्हेंबर 2019 पासून अगदी कमी कालावधीत, ई-संजीवनी आणि ई-संजीवनीओपीडीकडून दूरध्वनीद्वारे सल्लामसलत 23 राज्यांनी (ज्यांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 75% आहे) ने लागू केली आहे आणि इतर राज्ये ती सुरु करण्याच्या प्रक्रियेत आहेत.
इतर अपडेट्स:
- संरक्षण मंत्रालयाने 9 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर केलेल्या आयातविषयक वस्तूंच्या प्रतिबंधित(निगेटिव्ह) यादीविषयी काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या अस्त्रप्रणालींचे आयात प्रतिबंधित उपकरणांच्या यादीत समाविष्ट करण्याचे कारण हे सुनिश्चित करणे आहे, की संरक्षण दले अशाप्रकारच्या यंत्रणांची बाहेरून आयात करणार नाहीत. याठिकाणी हे ही नमूद केले जाते की एखादे उत्पादन ‘स्वदेशी उत्पादन’ म्हणून गणले जाण्यासाठी त्यातील देशी बनावटीच्या साहित्याचे निश्चित प्रमाण असणे ही पूर्वअट आहे. त्यामुळे, उत्पादकांनी आपल्या उपकरणांमध्ये जास्तीत जास्त स्वदेशी बनावटीचे सुटे साहित्य वापरणे आणि आयातीत वस्तूंचे प्रमाण परवानगीपेक्षा जास्त होऊ न देणेही महत्वाचे आहे.
- ‘मानव-वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी वन्यप्राण्यांना जंगलातच अन्न आणि पाणी मिळेल, याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न अत्यंत वेगाने सुरु आहेत,’ अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. जागतिक हत्ती दिनाच्या पूर्वसंध्येला नवी दिल्लीत आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
- दूरसंचार आणि दळणवळण विभागाने दूरस्थ आणि कठीण क्षेत्रांमध्ये राबवलेल्या प्रकल्पांविषयी माहिती देताना रवी शंकर प्रसाद यांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील सामरिकदृष्ट्या महत्वाच्या 354 गावांमध्ये जोडणीसाठी आणि बिहार, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि गुजरात राज्यातील प्राधान्य क्षेत्रांतील 144 गावांमध्ये जोडणीसाठी निविदा निश्चित करण्यात आल्या आहेत आणि अंमलबजावणी सुरु आहे. या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या गावांना मोबाईल जोडणी पुरवण्यात येणार आहे. या गावांमधील काम पूर्ण झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीर, लडाख या केंद्रशासित प्रदेशांतील कोणतेही गाव जोडणीविना राहणार नाही.
- केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की, एमएसएमईंची नवी व्याख्या, फंड ऑफ फंडस योजना, चॅम्पीअन्स पोर्टल, एमएसएमईंना विस्तारीत पतपुरवठा यामुळे महामारीमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला नक्कीच गती मिळेल. ते आज फिक्की कर्नाटक राज्य परिषदेने आयोजित केलेल्या एमएमएमई परिषदेत बोलत होते.
- भारत-कॅनडा आयसी-ईम्पॅक्टस वार्षिक संशोधन परिषदेत सध्याचे आंतरराष्ट्रीय संबंध, विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरी सामायिक करणे आणि सरकार आणि संस्थांमध्ये नवीन सहकार्यासाठी प्रोत्साहन देणे या घटकांना मजबूती देऊन दोन्ही देशांदरम्यान सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासंबंधी चर्चा झाली.
महाराष्ट्र अपडेट्स :
कोरोना संक्रमणाच्या पाच महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात रविवारी सर्वाधिक 390 मृत्यूंची नोंद झाली, तसेच सलग दुसऱ्या दिवशी राज्यात 12,000 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 17,757 एवढी झाली आहे. तर, 12,248 नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या 5.15 लाख झाली आहे. असे असले तरी, दिलासादायक बाब म्हणजे, नोंद झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. रविवारी, 13,348 रुग्णांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली, यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 3,51,710 एवढी झाली आहे.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image007UEW0YMJO.jpg)
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image008TEG2X4MP.jpg)
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image009FK3VIJS5.jpg)
***
M.C/S.T/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1644890)
Visitor Counter : 261
Read this release in:
Punjabi
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu