अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘विकसित भारत’ साध्य करण्यासाठी कृषी क्षेत्र केंद्रस्थानी असेल, जे सर्वसमावेशक विकासाला चालना देईल आणि लाखो लोकांच्या उपजीविकेत सुधारणा घडवून आणेल: आर्थिक पाहणी

मागील 5 वर्षांत कृषी क्षेत्राचा सरासरी वार्षिक वृद्धी दर 4.4% राहिला आहे

आर्थिक वर्ष 2016 ते आर्थिक वर्ष 2025 या कालावधीत 4.45% दशकीय वाढ झाली आहे; मागील दशकांच्या तुलनेत ही सर्वाधिक वाढ आहे

आर्थिक वर्ष 2024–25 मध्ये अन्नधान्य उत्पादनाने 3,577.3 लाख मेट्रिक टन (LMT) हा ऐतिहासिक उच्चांक गाठला

कृषी क्षेत्राच्या एकूण मूल्यवर्धनामध्ये (GVA) अंदाजे 33% वाटा असलेल्या फलोत्पादन क्षेत्राचा एक लक्षवेधी क्षेत्र म्हणून उदय, उत्पादनात 2013-14 मधील 280.70 दशलक्ष टनांवरून 2024-25 मध्ये 367.72 दशलक्ष टनांपर्यंत वाढ

प्रविष्टि तिथि: 29 JAN 2026 2:03PM by PIB Mumbai

 

भारतीय कृषी क्षेत्राने आपली लवचिकता सिद्ध केली आहे. या क्षेत्राने स्थिर वृद्धी नोंदवली असून, यातील मुख्य वाढ संबंधित क्षेत्रांतून (Allied Sector) झाली असल्याचे केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2025-26 मध्ये नमूद करण्यात आले आहे.

अलीकडच्या वर्षांत अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली असली तरी, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि फलोत्पादन यांसारखी उच्च-मूल्य असलेली संबंधित क्षेत्रे उत्पन्नाच्या संधी वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उपजीविका मजबूत करण्यासाठी अधिकाधिक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, यावर या सर्वेक्षणात भर देण्यात आला आहे.

आर्थिक पाहणीत असे नमूद करण्यात आले आहे की, गेल्या 5 वर्षांत कृषी आणि संबंधित क्षेत्राचा सरासरी वार्षिक वृद्धी दर सुमारे 4.4% वर स्थिर राहिला आहे.

आर्थिक वर्ष 2015 ते आर्थिक वर्ष 2024 दरम्यान पशुपालन क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे, या क्षेत्राच्या  सकल मूल्यवर्धनात चालू सध्याच्या किमतींवर जवळपास 195% वाढ झाली आहे. तर या कालावधीत 12.77% इतका चक्रवाढ वार्षिक वृद्धी दर (CAGR) नोंदवण्यात आला आहे.

भारतातील अन्नधान्य उत्पादनात सातत्याने वाढ होत असून कृषी वर्ष 2024–25 मध्ये अन्नधान्य उत्पादन 3577.3 लाख मेट्रिक टनांवर (LMT) पोहोचल्याचा अंदाज आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात 254.3 LMT ची वाढ झाली आहे. तांदूळ, गहू, मका आणि भरड धान्य (श्री अन्न) यांच्या वाढीव उत्पादनामुळे हा टप्पा गाठणे शक्य झाले आहे.

कृषी सकल मूल्यवर्धनात सुमारे 33% वाटा असलेले फलोत्पादन क्षेत्र देशाच्या कृषी विकासात एक 'लक्षवेधी क्षेत्र' ठरले आहे. 2024-25 मध्ये फलोत्पादन क्षेत्रातील उत्पादन 362.08 MT झाले असून, त्याने अंदाजित अन्नधान्य उत्पादनाला (329.68 MT) मागे टाकले आहे.

त्याशिवाय भारत जगातील सुक्या कांद्याचा सर्वात मोठा उत्पादक असून जागतिक उत्पादनात भारताचा वाटा सुमारे 25% आहे. भाज्या, फळे आणि बटाटे या तिन्ही श्रेणींमध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असून प्रत्येकी 12-13% जागतिक वाटा उचलतो. ही कामगिरी बागायती क्षेत्रातील भारताची मजबूत उपस्थिती, जागतिक अन्नाची मागणी पूर्ण करण्यात वाढती भूमिका आणि उच्च-मूल्य असलेल्या पीक उत्पादनातील संधींना अधोरेखित करत आहे.

आर्थिक पाहणीचा समारोप करताना असे म्हटले आहे की, 'विकसित भारत' साध्य करण्यासाठी कृषी क्षेत्र केंद्रस्थानी असेल, जे सर्वसमावेशक विकासाला गती देईल आणि लाखो लोकांची उपजीविका सुधारेल. भारताने कृषी उत्पादनात, विशेषतः दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय आणि बागायती क्षेत्र यांसारख्या प्रमुख क्षेत्रांत लक्षणीय प्रगती केली आहे, जे एकत्रितपणे देशाच्या जीडीपी मध्ये मोठे योगदान देत आहेत.

***

शिल्पा पोफळे/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2220363) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam