पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ईशान्य भारत आग्नेय आशियातील भारताचे नैसर्गिक प्रवेशद्वार कसे बनत आहे यावर पंतप्रधानांनी लेख शेअर केला

Posted On: 09 NOV 2025 11:16AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी लिहिलेला, ईशान्य भारत आग्नेय आशियातील भारताचा नैसर्गिक प्रवेशद्वार कसे बनत आहे, यावरील लेख शेअर केला. "ईशान्येला 'अष्टलक्ष्मी' म्हणून अधोरेखित करताना, ते आग्नेय आशियातील भारताचे नैसर्गिक प्रवेशद्वार कसे बनत आहे हे सिंधिया स्पष्ट करतात. ईशान्य ही केवळ भारताची सीमा नाही, तर ती आता बदलत्या देशाचा चेहरा आहे यावर ते भर देतात", असे मोदी म्हणाले.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी १० तारखेला लिहिलेल्या पोस्टला उत्तर देताना, मोदी म्हणाले:

"या अभ्यासपूर्ण लेखात, केंद्रीय मंत्री @JM_Scindia ईशान्येला भेट दिल्यानंतरचा त्यांचा अनुभव शेअर करतात, तिथले सौंदर्य आणि लोकांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे वर्णन करतात.

ईशान्येला 'अष्टलक्ष्मी' म्हणून अधोरेखित करताना, ते आग्नेय आशियातील भारताचे नैसर्गिक प्रवेशद्वार कसे बनत आहे हे सिंधिया स्पष्ट करतात. ईशान्य ही केवळ भारताची सीमा नाही, तर ती आता बदलत्या देशाचा चेहरा आहे यावर ते भर देतात."

***

जयदेवी पुजारी-स्वामी/पर्णिका हेदवकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2187997) Visitor Counter : 6