अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी भारतीय टपाल खाते  एक उत्प्रेरक म्हणून काम करेल :  अर्थसंकल्प 2025-26


भारतीय टपाल खात्याच्या सेवांचा विस्तार करून थेट लाभ हस्‍तांतरण, पत सेवा,  सूक्ष्म उद्योग, विमा सेवाही  देणार 

विश्वकर्मा, महिला, स्वयंसेवी गट, एमएसएमई इत्यादींच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय टपाल खात्याचे रूपांतर एका मोठ्या सार्वजनिक ‘लॉजिस्टिक्स’  संघटनेत करणार

Posted On: 01 FEB 2025 12:57PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, दि. 1  फेब्रुवारी, 2025

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री  निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत 2025-26  चा अर्थसंकल्प सादर करताना सांगितले कीदेशामध्‍ये  दीड लाख ग्रामीण टपाल  कार्यालये आहेत. सर्व टपाल  कार्यालये तसेच  इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि  2.4  लाख डाक सेवकांचे असलेले विशाल जाळे  हे  ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी उत्प्रेरक म्हणून काम करतील.

या अंदाजपत्रकामध्‍ये अर्थमंत्र्यांनी भारतीय टपाल सेवेच्या श्रेणींमध्‍ये विस्‍तार करण्‍याच्या योजनेअंतर्गत खालील  प्रस्ताव मांडले -  

१) ग्रामीण समुदाय केंद्र सह-स्थान;

२) संस्थात्मक खाते सेवा;

३) थेट लाभ हस्तांतरण , ‘कॅश आउट’  आणि ईएमआय (मासिक हप्ते)  भरून घेणे ;

४) सूक्ष्म उद्योगांना पत सेवा;

५) विमा; आणि

६) सहाय्य करणारी  डिजिटल सेवा.

अंदाजपत्रक मांडतानासीतारामन पुढे म्हणाल्या कीदेशातील  पोस्टाचे  रूपांतर एका मोठ्या सार्वजनिक ‘लॉजिस्टिक्स’ संस्थेत केले जाईल.  यामुळे विश्वकर्मा, नवीन उद्योजक, महिला, बचत गट, एमएसएमई आणि मोठ्या व्यावसायिक संस्थांच्या वाढत्या गरजा पूर्ण होवू शकतील.

केंद्रीय वित्त मंत्र्यांनी असेही सांगितले कीइंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सेवा ग्रामीण भागात अधिक खोलवर, सर्वांपर्यंत पोहोचवल्‍या जातील  आणि  त्यांचा विस्तार  केला जाईल.

***

JPS/S.Bedekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2098498) Visitor Counter : 67