अर्थ मंत्रालय

झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि लोकसंख्याशास्त्रीय बदलांमुळे विकसित भारताच्या उद्दिष्टासमोर निर्माण होत आहेत आव्हाने


झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि लोकसंख्याशास्त्रीय बदलांमुळे निर्माण होत असलेल्या आव्हानांचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना करणार

Posted On: 01 FEB 2024 5:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 1 फेब्रुवारी 2024

 

2047 पर्यंत विकसित भारत आणि अमृत काळ यावर भर देत केंद्रीय अर्थ आणि कॉर्पारेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि लोकसंख्याशास्त्रीय बदलांमुळे विकसित भारताच्या उद्दिष्टासमोर आव्हाने निर्माण होत आहेत, अशी चिंता आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 सादर करत असताना व्यक्त केली. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि लोकसंख्याशास्त्रीय बदलांमुळे निर्माण होत असलेल्या आव्हानांचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना करणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी प्रस्तावित केले. त्या पुढे म्हणाल्या की या आव्हानांना तोंड देण्यासाठी उपाय सुचवण्याची जबाबदारी या समितीवर असेल.

A.Chavan/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2001518) Visitor Counter : 95