पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी, महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीरांच्या महान शिकवणीचे केले स्मरण

Posted On: 04 APR 2023 10:09AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीरांना नमन करताना सांगितले की, भगवान महावीरांनी शांततापूर्ण, सौहार्दपूर्ण आणि समृद्ध समाज निर्माण करण्याचा मार्ग दाखवला.

 

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"आजचा दिवस विशेष आहे,  आपण आज भगवान महावीरांच्या महान शिकवणीचे स्मरण करतो. त्यांनी शांततापूर्ण, सौहार्दपूर्ण आणि समृद्ध समाज निर्माण करण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या प्रेरणेने, आपण नेहमी इतरांची सेवा करूया आणि गरीब आणि वंचितांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणूया.  "

 

***

UmeshU/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1913502) Visitor Counter : 103