पंतप्रधान कार्यालय

बिहारच्या अनेक जिल्ह्यांत वादळ आणि वीज कोसळून झालेल्या दुर्घटनांमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त

Posted On: 20 MAY 2022 11:12PM by PIB Mumbai

बिहारच्या अनेक जिल्ह्यांत वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. मदत आणि बचावकार्य स्थानिक प्रशासनाद्वारे काळजीपूर्वक सुरु असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणतात,

"बिहारच्या अनेक जिल्ह्यांत वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे अनेकांना प्राण गमवावे लागल्याने अतिशय दुःख वाटते आहे. हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्या दुःखी कुटुंबांना देवो, अशी प्रार्थना. राज्य सरकारच्या देखरेखीअन्तर्गत स्थानिक प्रशासनाद्वारे तत्परतेने व काळजीपूर्वक मदत आणि बचावकार्य सुरु आहे."

***

JPS/JW/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1827152) Visitor Counter : 150