पंतप्रधान कार्यालय

भारत-बांगलादेश मैत्रीची 50 वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवली गेली त्याचे आम्ही संयुक्तपणे स्मरण करत हा दिवस साजरा करतो: पंतप्रधान

Posted On: 06 DEC 2021 11:19AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की भारत-बांगलादेश मैत्रीची 50 वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवली गेली, त्याचे आम्ही संयुक्तपणे स्मरण करतो आणि हा दिवस साजरा करतो.

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"आज भारत आणि बांगलादेश मैत्री दिवस साजरा करत आहेत. आम्ही आमच्या 50 वर्षांच्या मैत्रीचे स्मरण करत आहोत आणि हा दिवस साजरा करत आहोत. आमचे संबंध आणखी विस्तारण्यासाठी आणि अधिक दृढ करण्यासाठी मी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत काम करत राहण्यास उत्सुक आहे."

***

 

ST/VinayakCY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1778392) Visitor Counter : 221