PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
01 SEP 2020 7:35PM by PIB Mumbai

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)



दिल्ली-मुंबई, 1 सप्टेंबर 2020
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाने शोक व्यक्त केला आहे. मुखर्जी यांच्या स्मरणार्थ केंद्रिय मंत्रिमंडळाने दोन मिनिटांचे मौन राखले.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
प्रतिदिन 60,000 पेक्षा जास्त रुग्ण बरे होण्याचा सलग पाच दिवस चाललेला कल कायम ठेवत, गेल्या चोवीस तासात भारतात 65,081 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 28,39,882 असून त्यानुसार कोविड-19 च्या रुग्णांचा बरे होण्याचा दर आणखी वाढून 77% झाला आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 3.61 पटीने जास्त आहे.
भारतात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 7,85,996 असून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 20.53 लाखाहून जास्त आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येपेक्षा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या चार पट वाढली आहे.
गेल्या 24 तासात पाच राज्यांमध्ये सर्वाधिक नवे रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. ती आकडेवारी पुढीलप्रमाणे :
- महाराष्ट्र -11,852
- आंध्रप्रदेश - 10,004
- कर्नाटक - 6,495
- तामिळनाडू - 5,956
- उत्तर प्रदेश - 4,782
या पाच राज्यांमधील रुग्णांची एकूण संख्या गेल्या 24 तासात देशभरात आढळलेल्या नवीन रुग्णांच्या संख्येच्या 56% आहे.
या पाच राज्यांमध्ये गेल्या चोवीस तासात सर्वाधिक रुग्ण बरे होऊन घरी पाठवल्याचीही नोंद झाली असून ती संख्या देशभरातल्या 65,081 बरे झालेल्या रुग्णांच्या 58.4% आहे. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात 11,158 रुग्ण बरे झाले असून आंध्र प्रदेशात 8,772, कर्नाटकात 7,238 , तामिळनाडूत 6008, तर उत्तर प्रदेशात 4,597 कोविड रुग्ण बरे झाले आहेत.
वरील पाच राज्यांमध्ये मिळून गेल्या चोवीस तासात एकूण 536 मृत्यूची नोंद झाली असून देशभरात झालेल्या एकूण मृत्यूच्या संख्येच्या(819) तुलनेत हे प्रमाण 65.4% आहे. महाराष्ट्रात 184 मृत्यू नोंदवले गेले, तर कर्नाटकात 113 , त्याखालोखाल तामिळनाडूत 91, आंध्रप्रदेशात 85, तर उत्तर प्रदेशात 63 मृत्यूची नोंद झाली आहे.
भारताच्या एकत्रित चाचण्यांच्या संख्येने आज 4.3 कोटींचा (4,33,24,834) टप्पा पार केला आहे. गेल्या दोन आठवड्यात तब्बल 1,22,66,514 चाचण्या घेण्यात आल्या. राज्ये / केंद्रशासित प्रदेश त्यांची चाचणी क्षमता वाढवत आहेत. एकूण चाचण्यांमध्ये जास्तीत जास्त योगदान देणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांचा समावेश आहे. एकूण चाचण्यांपैकी सुमारे 34% चाचण्या या तीन राज्यांनी केल्या आहेत. भारताच्या प्रतिदिन चाचणी क्षमतेने 10 लाख चाचण्याचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत 10,16,920 चाचण्या घेण्यात आल्या.
दिनांक 1 सप्टेंबर 2020 रोजी राज्य / केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येतील वाढ, रुग्ण बरे होण्याची, मृत्युंची आकडेवारी इथे पाहता येईल.
इतर
- मालवाहतुकीचे प्रमाण वाढविण्यासाठी झपाट्याने काम करीत भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडून दाखवला आहे. रेल्वे मालवाहतुकीसाठी मालाची चढाई करण्याचे प्रमाण ऑगस्ट 2020 मध्ये गेल्यावर्षीच्या याच महिन्यापेक्षा वाढले आहे. ऑगस्ट 2020 मध्ये भारतीय रेल्वेतून वाहतूक करण्यासाठी 94.33 दशलक्ष म्हणजे 9.433 कोटी टन माल चढवला गेला. गेल्यावर्षीच्या याच महिन्यातील याच आकड्याच्या (91.02 दशलक्ष टन) तुलनेत हे प्रमाण 3.31 दशलक्ष टनांनी अधिक आहे.
- रेल्वे आणि वाणिज्य तथा उद्योगमंत्री श्री.पियुष गोयल यांनी DFCCIL अर्थात 'भारतीय मालवाहतूक समर्पित मार्गिका महामंडळ मर्यादित'च्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी रेल्वे मंडळ आणि DFCCIL चे वरिष्ठ अधिकारी आणि कंत्राटदार संस्थांचे अधिकारी उपस्थित होते. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष तसेच DFCCIL चे व्यवस्थापकीय संचालकही यात सहभागी झाले होते.
-
- नवीन एकात्मिक शीतगृह शृंखला प्रकल्पांमुळे 16,200 शेतक-यांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता असून त्याचा 2,57,904 शेतकरी बांधवांना लाभ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी दिली आहे. प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत (पीएमकेएसवाय) एकात्मिक शीतगृह शृंखला आणि मूल्यवर्धित पायाभूत सुविधा याविषयी चर्चा करण्यासाठी व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे अध्यक्षस्थान हरसिमरत कौर बादल यांनी भूषविले.
- जपान सरकारने कोविड-19 संकटासाठी तातडीची मदत म्हणून सुमारे 3,500 कोटी रुपये (जेपीवाय 50 बिलियन) देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील दस्ताऐवजांचे आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ सी.एस. मोहपात्रा आणि जपानचे राजदूत सुझूकी सातोषी यांच्यात आदानप्रदान करण्यात आले.
- कोळसा क्षेत्रामध्ये देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी सन 2023-24 पर्यंत 1अब्ज टन कोळसा उत्पादन करण्याचे लक्ष्य कोळसा मंत्रालयाने निश्चित केले आहे. यासाठी देशातली प्रमुख कोळसा उत्पादक संस्था- कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) वेगवेगळ्या 500 प्रकल्पांमध्ये 1.22 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. कोळसा काढणे, पायाभूत सुविधा, प्रकल्पांचा विकास करणे, शोध घेणे आणि स्वच्छ कोळसा तंत्रज्ञान वापरणे यासाठी ही गुंतवणूक असणार आहे, अशी माहिती केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. कोल इंडियाच्यावतीने या क्षेत्रातल्या भागधारकांबरोबर एका व्हिडिओ काॅन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये प्रल्हाद जोशी बोलत होते.
- भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पियुष गोयल, ऑस्ट्रेलियाचे व्यापार, पर्यटन आणि गुंतवणूक मंत्री, सिनेट सदस्य श्री सायमन बर्मिंगहॅम आणि जपानचे अर्थ, व्यापार आणि उद्योग मंत्री श्री काजियामा हिरोशी या मंत्र्यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. एक मुक्त, निष्पक्ष, सर्वसमावेशक, भेदभाव नसलेला, पारदर्शक, आणि स्थिर व्यापार आणि गुंतवणुकीचे वातावरण देत आणि आपल्या बाजारपेठा खुल्या ठेवण्यात पुढाकार घेण्याचा दृढ निश्चिय मंत्र्यांनी व्यक्त केला. कोविड–19 संकट आणि आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या पटलावर नुकत्याच झालेल्या जागतिक पातळीवरील बदलांच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी इंडो – पॅसिफिक प्रदेशात पुरवठा साखळींचा लवचिकपणा वाढविण्याची गरज आणि क्षमता यावर जोर दिला.
- ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी अलिकडेच “एक राष्ट्र एक शिधापत्रिका” योजनेच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि लडाख व लक्षद्वीप या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या आवश्यक तांत्रिक सज्जतेची दखल घेत विद्यमान 24 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या राष्ट्रीय पोर्टेबिलिटी क्लस्टरसह या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या एकत्रिकरणाला मंजुरी दिली.
- मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांमध्ये वाढलेल्या पाणी पातळीमुळे महाराष्ट्रातील नागपूर आणि मध्य प्रदेशातील होशंगाबाद, सेरोर आणि रायसेन जिल्हे जलमय झाले आहेत. प्रशासनाच्या विनंतीवरुन दक्षिण कमांडने पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य हाती घेतले आहे.
- 2030 पर्यंत 100 दशलक्ष टन कोळशाचे गॅसिफिकेशन करण्याचे भारताचे उद्दीष्ट आहे. यासाठी 4 लाख कोटी रुपये गुंतवणूक केली जाईल असे केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले. कोळसा गॅसिफिकेशन आणि लिक्विफॅक्शन या विषयावर वेबिनारला संबोधित करताना जोशी म्हणाले की कोळसा गॅसिफिकेशन आणि लिक्विफॅक्शन आता आकांक्षा नसून ती गरज बनली आहे. ते म्हणाले की, इंधनाच्या स्वच्छ स्त्रोतांच्या वापराला प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने गॅसिफिकेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या कोळशाच्या महसुली वाट्यावर 20% सवलत दिली आहे.
महाराष्ट्र अपडेट्स
सोमवारी नोंद झालेल्या 1,935 नवीन केसेस सहित एकूण 1,75,105 केसेस नोंद करून पुण्याने दिल्लीला रुग्ण संख्येमध्ये मागे टाकले आहे. दिल्लीमध्ये एक 1.74 लाख केसेस नोंद झाल्या आहेत. मुंबईची रुग्णसंख्या 1.45 लाख आहे. पुण्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 52,172 आहे. महाराष्ट्राने सोमवारी 11,852 नवीन केसेस नोंद केल्या त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 7,92,541 झाली आहे. या दरम्यान राज्य सरकारने राज्याअंतर्गत वाहतुकीवरील निर्बंध हटवले आहेत आणि ई-पास ची आवश्यकता देखील रद्द केली आहे.
FACT CHECK

* * *
MC/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1650450)
Visitor Counter : 254