पंतप्रधान कार्यालय

भारतीय रिझर्व बँकेने आज जाहीर केलेल्या उपायांचे पंतप्रधानांनी केले कौतुक, तरलता वाढेल आणि पतपुरवठा सुधारेल- पंतप्रधान

Posted On: 17 APR 2020 4:08PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 एप्रिल 2020

 

भारतीय रिझर्व बँकेने आज जाहीर केलेल्या उपायांचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. या उपाययोजनांमुळे तरलता वाढेल आणि पतपुरवठ्यात सुधारणा होईल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

''रिझर्व बँकेच्या आजच्या घोषणांमुळे तरलता मोठ्या प्रमाणात वाढेल आणि पतपुरवठ्यात सुधारणा होईल. या उपायांमुळे आपल्या लघूउद्योजकांना सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना, शेतकरी आणि गरिबांना मदत होईल. तसेच डब्ल्यूएमए मर्यादा वाढवल्याचाही सर्व राज्यांना लाभ होईल”, असे पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.

Today’s announcements by @RBI will greatly enhance liquidity and improve credit supply. These steps would help our small businesses, MSMEs, farmers and the poor. It will also help all states by increasing WMA limits.

— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2020

 

U.Ujgare/S.Kakade/P.Kor



(Release ID: 1615361) Visitor Counter : 177