इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या विशेष अभियानाद्वारे शालेय विद्यार्थ्यांसाठी आधार मधील 2 कोटींहून अधिक अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतने (एमबीयु) पूर्ण, देशभरातील सुमारे 1.6 लाख शाळांमध्ये हे अभियान राबवण्यात आले
या उपक्रमाचा भाग म्हणून 30 सप्टेंबर 2026 पर्यंत 5 ते 17 वर्षे या वयोगटासाठी एमबीयुची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे
प्रविष्टि तिथि:
18 AUG 2026 5:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2026
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) तर्फे देशभरात युद्ध पातळीवर राबवण्यात येत असलेल्या अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतन (एमबीयू) मोहिमेने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून देशभरातील शालेय विद्यार्थ्यांपैकी 20 दशलक्षांहून अधिक (2 कोटींहून अधिक) विद्यार्थ्यांची अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतने पूर्ण करण्यात यश मिळाले आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या एमबीयू स्थितीबाबत दृश्यमानता देऊ करणाऱ्या शिक्षणासाठीच्या एकीकृत जिल्हा माहिती यंत्रणा प्लस (यूडीआयएसई+) सह यूआयडीएआयचे तांत्रिक एकत्रीकरण करून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
सप्टेंबर 2025 मध्ये सुरु करण्यात आलेल्या विशेष अभियानाचा विस्तार आतापर्यंत 1.56 लाख शाळांपर्यंत झाला असून या अभियानाच्या मदतीने, समर्पित शाळा-स्तरीय शिबिरे तसेच यूआयडीएआय आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण विभागांतर्फे राबवण्यात येणारे समन्वित संपर्क कार्यक्रम यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे आधार बायोमेट्रिक अद्ययावतीकरण करणे सोयीस्कररित्या शक्य झाले आहे. या उपक्रमामुळे एमबीयूसंबंधी सेवा विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या शाळेत उपलब्ध होण्यात मदत झाली असून सदर प्रक्रिया कोट्यवधी विद्यार्थ्यांसाठी अधिक सुलभतेने आणि सोयीस्कर पद्धतीने उपलब्ध झाली आहे.
पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठीच्या आधार नोंदणीद्वारे लोकसंख्याविषयक माहिती आणि छायाचित्र जमा केले जाते तर या वयात बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे बायोमेट्रिक्स अजूनही विकास पावत असल्यामुळे या मुलांच्या दोन्ही बायोमेट्रिक घटकांची नोंद केली जात नाही.लहान मुलांच्या आधारमध्ये अद्ययावत बायोमेट्रिक माहिती जमा केली जाईल याची सुनिश्चिती करून घेण्यासाठी एमबीयु सहाय्यक ठरते.
बालकाच्या वयाची 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणि पुन्हा त्याच्या वयाची 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अशा दोन टप्प्यांवर एमबीयु आवशयक असते. एमबीयुची योग्य वेळी पूर्तता झाल्यामुळे विद्यार्थ्याला शाळा आणि उच्च शिक्षणाचे टप्पे पार करत आधार प्रमाणीकरण अनिवार्य असलेल्या विविध सेवा आणि लाभ मिळवताना आवश्यक असलेली आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्याची सुनिश्चिती होण्यात मदत होते.
सदर प्रक्रियेची वेळेवर पूर्तता करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या आणि संबंधित सेवा आधील सुलभतेने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने युआयडीएआयने 7 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना एमबीयूसाठी भरावे लागणारे शुल्क 1 ऑक्टोबर 2025 पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द केले होते. वय वर्षे 5 ते 7 आणि 15 ते 17 या गटांतील मुलांसाठी पूर्वीप्रमाणेच यापुढेही एमबीयू सेवा निःशुल्क असणार आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या 30 सप्टेंबर 2026 पर्यंत 5 ते 17 वर्षे या वयोगटासाठी एमबीयू मोफत असणार आहे.
आधारचे एमबीयू करून घेतले नाही तर विविध सरकारी योजनांचा लाभ घेताना, नीट, जेईई, सीईआयटी इत्यादींसारख्या अनेक स्पर्धा तसेच विद्यापीठ परीक्षांसाठी नावनोंदणी करताना आवश्यक असलेल्या प्रमाणीकरणाच्या वेळी अडचणी उद्भवू शकतात. पालकांनी तसेच कायदेशीर संरक्षकांनी त्यांच्या मुलांसाठी आधारमध्ये एमबीयूची पूर्तता करून घ्यावी असे आवाहन यूआयडीएआयने केले आहे.
शैलेश पाटील/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2300922)
आगंतुक पटल : 10