पंतप्रधान कार्यालय
देशाचा ईशान्य भाग कशा प्रकारे आघाडी घेऊ लागला आहे याविषयीचा एक लेख पंतप्रधानांनी केला सामाईक
Posted On:
12 SEP 2025 5:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2025
देशाचा ईशान्य भाग विकासात कशा प्रकारे आघाडी घेऊ लागला आहे याविषयी माहिती देणारा एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामाईक केला आहे. मिझोरामला राष्ट्रीय जाळ्यासोबत जोडणाऱ्या बैराबी- सैरांग रेल्वे मार्गाचे उद्घाटन कशा प्रकारे एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे ज्यामुळे या भागातील व्यापार, संपर्कव्यवस्था आणि संधींची दालने खुली होत आहेत याविषयी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लिहिलेल्या लेखाकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले आहे.
पीएमओ इंडिया हँडलने एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहेः
"देशाचा ईशान्य प्रदेश आता विकासाची प्रतीक्षा करणारा सीमावर्ती भाग राहिलेला नाही तर भारताच्या विकासगाथेचा केंद्रबिंदू बनला आहे. बैराबी- सैरांग रेल्वे मार्ग हा एक ऐतिहासिक टप्पा आहे, जो मिझोरामला राष्ट्रीय जाळ्यासोबत जोडत आहे, या भागातील व्यापार, संपर्कव्यवस्था आणि संधींची दालने खुली करत आहे.
देशाचा ईशान्य भाग विकासात कशा प्रकारे आघाडी घेऊ लागला आहे याविषयीची माहिती देणारा केंद्रीय मंत्री @AshwiniVaishnaw यांचा हा लेख जरुर वाचा !”
सुषमा काणे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2166056)
Visitor Counter : 2
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam