गृह मंत्रालय
पूरग्रस्त आणि भूस्खलन बाधित आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, केरळ आणि उत्तराखंड या राज्यांकरता केंद्र सरकारने एक हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक सहाय्य जारी करण्याला दिली मंजुरी
Posted On:
10 JUL 2025 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2025
केंद्र सरकारने पूरग्रस्त आणि भूस्खलन बाधित आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, केरळ आणि उत्तराखंड या राज्यांकरता 1,066.80 कोटी रुपये जारी करण्याला मंजुरी दिली आहे. यावर्षी नैऋत्य मोसमी पावसात झालेली अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि भूस्खलन यामुळे या राज्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. मोदी सरकार कोणत्याही परिस्थितीत सर्व राज्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
केंद्र सरकारने या वर्षी, 14 राज्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 6,166.00 कोटी रुपये आणि 12 राज्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून 1,988.91 कोटी रुपये आधीच दिले आहेत. याशिवाय, राज्य आपत्ती निवारण निधीमधून 5 राज्यांना 726.20 कोटी रुपये आणि 2 राज्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून 17.55 कोटी रुपये देखील जारी करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने पूरग्रस्त, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित राज्यांना आवश्यक त्या लॉजिस्टिक सुविधा पुरवल्या असून त्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दले, लष्कराची पथके आणि हवाई दलाची पथके यांचा समावेश आहे. सध्याच्या मान्सून मध्ये 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बचाव आणि मदत कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची 104 पथके तैनात करण्यात आली आहेत.
N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2143818)
Visitor Counter : 4