आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात एकूण 14.78 कोटीहून अधिक लसीकरण मात्रा देण्यात आल्या


गेल्या 24 तासात 25 लाखापेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या

गेल्या 24 तासात देशभरात सुमारे 2.60 लाख रुग्ण कोरोना मुक्त

5 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात गेल्या 24 तासात एकही कोरोना बळी नाही

Posted On: 28 APR 2021 11:17AM by PIB Mumbai

भारतात  देण्यात येणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांनी आज  14.78 कोटीचा टप्पा ओलांडला.  

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतात 21,18,435 सत्राद्वारे लसीच्या 14,78,27,367 मात्रा देण्यात आल्या.

यामध्ये 93,47,775 आरोग्य कर्मचारी ( पहिली मात्रा ), 61,06,237 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा ), 1,22,21,975 फ्रंट लाईन कर्मचारी ( पहिली मात्रा ), 65,26,378 फ्रंट लाईन कर्मचारी(दुसरी मात्रा ), 60 वर्षावरील 5,10,85,677 लाभार्थी ( पहिली मात्रा ), 93,37,292  (दुसरी मात्रा ),45 ते 60 वयोगटातल्या 5,02,74,581  ( पहिली मात्रा ), आणि 29,27,452 लाभार्थी (दुसरी मात्रा )  यांचा समावेश आहे.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 67.26% मात्रा दहा   राज्यात देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 25 लाखापेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या.

लसीकरण अभियानाच्या 102 व्या दिवशी (27  एप्रिल 2021) ला 25,56,182 लसीकरण मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 22,989  सत्रात 15,69,000 लाभार्थींना पहिली मात्रा  आणि 9,87,182 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा  देण्यात आली.

भारतात एकूण 1,48,17,371 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 82.33%.आहे.

गेल्या 24 तासात 2,61,162 रुग्ण कोरोनातून बरे झाले.

यापैकी 79.01%  व्यक्ती दहा राज्यातल्या आहेत.

गेल्या 24 तासात 3,60,960 नव्या रुग्णांची नोंद झाली.

नव्या रुग्णांपैकी 73.59% रुग्णमहाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यांमध्ये आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 66,358 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.त्यानंतर उत्तर प्रदेश 32,921 आणि केरळमध्ये 32,819 नव्या रुग्णांची नोंद झाली.

भारतात आज उपचाराधीन  रुग्णांची एकूण  संख्या 29,78,709 आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 16.55% आहे.

देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 71.91% रुग्ण नऊ      राज्यांमध्ये आहेत.

राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून हा दर सध्या 1.12% आहे. 

गेल्या 24 तासात 3,293 रुग्णांचा मृत्यू झाला

यापैकी 78.53% मृत्यू दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 895 जणांचा मृत्यू झाला, दिल्लीमध्ये 381 जणांचा मृत्यू झाला.

पाच राज्ये / केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासात कोविड -19 मुळे एकही मृत्यू झालेला नाही. यामध्ये दमण आणि दीव आणि दादरा नगर हवेली, लक्षदीप, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान आणि निकोबार  यांचा समावेश आहे. 

***

Jaydevi PS/NC/CY        

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1714548) Visitor Counter : 222