आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

मृतांच्या संख्येत घट कायम, दैनंदिन मृत्यू 100 पेक्षा कमी


जगात सर्वात कमी मृत्युदरापैकी एक, कोविड रुग्णांचा मृत्यू दर भारतात 1.5 टक्क्यांच्या खाली

रुग्ण बरे होण्याचा जगातील सर्वाधिक, भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.31 टक्के

82 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण

Posted On: 14 FEB 2021 1:28PM by PIB Mumbai

 

भारतात 1 ऑक्टोबर 2020 पासून सातत्याने दैनंदिन मृत्यूची संख्या कमी होत आहे. देशभरात गेल्या 24 तासात 92 मृत्यूंची नोंद झाली आहे.

1 ऑक्टोबर 2020 पासून, भारतात कोविडच्या मृत्यूदरामध्ये विलक्षण घट होत असल्याचे दिसत आहे. आज हा मृत्यू दर 1.5 (1.43 टक्के) पेक्षा कमी आहे. भारतातील रुग्णांचा मृत्यू दर हा जगातील सर्वात कमी मृत्यू दर असलेल्यांपैकी एक आहे.

आतापर्यंत 1.06 कोटी (1,06,11,731) पेक्षा अधिक लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 11,016 रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचा जगातील सर्वाधिक उच्च दर असलेल्या देशांपैकी एक  असलेल्या भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर 97.31 टक्के इतका आहे. बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्ण यांच्यातील फरक आज 1,04,74,164 इतका वाढला आहे.

देशभरात कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचारी आणि अग्रभागी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्येने 14 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत, 82 लाखांचा टप्पा ओलांडला  आहे.

आज सकाळी आठ वाजेपर्यंत हाती आलेल्या प्राथमिक अहवाला नुसार, 82,63,858 लाभार्थ्यांचे  1,72,852 सत्रांमधून लसीकरण झाले आहे. यामध्ये 59,84,018 आरोग्य कर्मचारी (पहिले लसीकरण), 23,628 आरोग्य कर्मचाऱ्यांचे (दुसरे लसीकरण) आणि 22,56,212 अग्रभागी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे (पहिले लसीकरण) करण्यात आले आहे.

पहिली लस  घेतलेल्या लाभार्थ्यांचे  28 दिवस पूर्ण झाले आहेत, अशा लाभार्थ्यांना काल कोविड 19 लसीकरणाचा दुसरा डोस देण्यास प्रारंभ झाला आहे.

 

S.

No.

 

State/UT

Beneficiaries vaccinated

1st Dose

2nd Dose

Total Doses

1

A & N Islands

3,646

0

3,646

2

Andhra Pradesh

3,56,521

5,820

3,62,341

3

Arunachal Pradesh

15,633

461

16,094

4

Assam

1,27,566

2,215

1,29,781

5

Bihar

4,91,233

0

4,91,233

6

Chandigarh

8,660

143

8,803

7

Chhattisgarh

2,61,274

833

2,62,107

8

Dadra & Nagar Haveli

2,922

41

2,963

9

Daman & Diu

1,121

30

1,151

10

Delhi

1,89,351

1,856

1,91,207

11

Goa

13,166

517

13,683

12

Gujarat

6,80,326

0

6,80,326

13

Haryana

1,95,745

588

1,96,333

14

Himachal Pradesh

81,482

475

81,957

15

Jammu & Kashmir

1,28,822

807

1,29,629

16

Jharkhand

1,99,008

1,873

2,00,881

17

Karnataka

4,96,159

0

4,96,159

18

Kerala

3,56,322

0

3,56,322

19

Ladakh

2,904

77

2,981

20

Lakshadweep

1,776

0

1,776

21

Madhya Pradesh

5,57,105

0

5,57,105

22

Maharashtra

6,82,420

189

6,82,609

23

Manipur

22,362

55

22,417

24

Meghalaya

13,998

91

14,089

25

Mizoram

11,494

74

11,568

26

Nagaland

9,684

0

9,684

27

Odisha

4,11,939

0

4,11,939

28

Puducherry

5,953

71

6,024

29

Punjab

1,03,799

59

1,03,858

30

Rajasthan

6,09,568

0

6,09,568

31

Sikkim

8,335

0

8,335

32

Tamil Nadu

2,46,420

1,154

2,47,574

33

Telangana

2,78,915

3,273

2,82,188

34

Tripura

69,196

366

69,562

35

Uttar Pradesh

8,58,602

0

8,58,602

36

Uttarakhand

1,08,974

0

1,08,974

37

West Bengal

5,12,772

2,345

5,15,117

38

Miscellaneous

1,15,057

215

1,15,272

 

Total

82,40,230

23,628

82,63,858

लसीकरण मोहिमेच्या 29 व्या दिवशी (13 फेब्रुवारी 2021), एकूण 2,96,211 लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. त्यापैकी 2,72,583 लाभार्थ्यांनी 8,071 सत्रांमधून लसीकरणाचा पहिला डोस घेतला होता आणि 23,628 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला.

दिवसागणिक लसीकरणाच्या संख्येमध्ये वाढ होत  आहे.

एकूण लसीकरणापैकी 68.55 टक्के लसीकरण हे 10 राज्यांमधून झाले आहे.

एकूण बरे झालेल्या रुग्णांपैकी 81.58 टक्क रुग्ण हे 6 राज्यांमधील असल्याचे आढळले आहे.

केरळमध्ये एकाच दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक, म्हणजे 5,835 इतकी आढळली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 1,773 रुग्ण बरे झाले आहेत तर त्यानंतर तामिळनाडूमध्ये 482 इतकी बरे झालेल्या रुग्णांची संख्या आहे.

भारतातील एकूण बाधित रुग्ण संख्यापैकी केवळ 1.26 टक्के रुग्ण संख्या ही सध्या सक्रीय असलेली रुग्णसंख्या आहे. आज भारतातील एकूण सक्रीय रुग्णसंख्येचा दर हा 1.37 लाख (1,37,567) पर्यंत खाली आला आहे.

नवीन रुग्णसंख्येपैकी 86.25 टक्के रुग्णसंख्या ही सहा राज्यांमधील आहे.

केरळमध्ये पुन्हा नव्याने आढळलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजे, 5,471 इतकी आहे. त्यानंतर महाराष्ट्रात ती 3,611 इतकी तर तामिळनाडूमध्ये 477 इतकी नव्या रुग्णांची संख्या नोंदविण्यात आली आहे.

नवीन मृत्यू संख्येपैकी 78.3 टक्के रुग्ण सहा राज्यांमधील आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू (38) आढळले आहेत. त्यानंतर केरळ येथे दैनंदिन मृत्यू संख्या 16 तर तामिळनाडू आणि छत्तीसगड येथे अनुक्रमे पाच नवीन मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

***

Jaydevi PS/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1697899) Visitor Counter : 422