पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाघजन आग दुर्घटनेविषयी आसामच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा; सर्वतोपरी मदतीची ग्वाही

Posted On: 10 JUN 2020 11:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जून 2020

 

बाघजन आग दुर्घटनेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी चर्चा केली असून, या आपत्तीमध्ये केंद्राकडून सर्वतोपरी मदत देण्यात येईल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.

यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्वीट संदेशात असे म्हटले आहे की, “पंतप्रधानांनी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी बाघजन दुर्घटनेविषयी चर्चा केली आहे. तसेच केंद्राकडून यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे. आगीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर अगदी बारकाईन लक्ष देण्यात येत आहे”.

 

 

* * *

S.Thakur/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1655264) Visitor Counter : 122