गृह मंत्रालय

बिहार आणि उत्तर प्रदेशात वीज कोसळून आणि मुसळधार पावसामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले तीव्र दुःख

Posted On: 26 JUN 2020 6:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जून 2020

बिहार आणि उत्तर प्रदेशात वीज कोसळून आणि मुसळधार पावसामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ‘‘बिहार आणि उत्तर प्रदेशात वीज कोसळून आणि मुसळधार पावसामुळे असंख्य अमूल्य जीव गमवावे लागल्यामुळे आपल्याला अतिशय शोक झाला आहे’’, असे मनोगत अमित शाह यांनी व्टिटरव्दारे व्यक्त केले आहे.

‘‘ या दोन्ही राज्यांमध्ये मदत कार्य वेगाने सुरू आहे,’’ असे केंद्रीय गृह मंत्र्यांनी म्हटले आहे.

‘‘या आपत्तीमध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांविषयी मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी झाले आहेत, त्यांच्या आरोग्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करतो’’ असे अमित शहा यांनी म्हटले आहे.

 

G.Chippalkatti/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1634580) Visitor Counter : 132