पंतप्रधान कार्यालय

चक्रीवादळामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा


जनतेला सुरक्षा उपायांसह सावधगिरी बाळगण्याचे केले आवाहन

Posted On: 02 JUN 2020 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जून 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर घोंघावणाऱ्या चक्रीवादळामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी नागरिकांना शक्य ती सर्व सावधगिरी बाळगण्याचे तसेच सुरक्षा उपाययोजना करण्याचे आवाहन केले.

भारताच्या पश्चिम किनारपट्टी भागातील चक्रीवादळामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत आहे. मी नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी शक्य ती सर्व सावधगिरी बाळगावी आणि सुरक्षा उपाय करावेत., असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

 

R.Tidke/S.Pophale/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1628709) Visitor Counter : 154