पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सामूहिक एकतेतच खरी ताकद असल्याचा संदेश देणारे सुभाषित सामाईक केले
प्रविष्टि तिथि:
05 JAN 2026 9:17AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या शाश्वत संस्कृती आणि आध्यात्मिक वारशाला आदरांजली वाहिली आणि शतकानुशतके झालेल्या असंख्य आक्रमणांनंतरही टिकून राहिलेल्या भारताच्या लवचिकतेवर भर दिला. त्यांनी नमूद केले की भारताचा सभ्यतागत प्रवास देशातील जनतेच्या सामूहिक शक्तीमुळेच टिकून राहिला आहे. नागरिकांनी अखंड निष्ठा आणि अटळ समर्पणाने भारताच्या सांस्कृतिक वारशाचे संरक्षण केले, असे त्यांनी अधोरेखित केले.
‘एक्स’ वर संस्कृतमधील सुभाषित शेअर करत त्यांनी सहनशीलता आणि लवचिकतेचा सखोल अर्थ व्यक्त केला:
“आपली महान संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरा अनेक शतकांमध्ये असंख्य हल्ल्यांची साक्षीदार राहिली आहे. देशवासियांची सामूहिक एकजूट आणि ताकदच अशी आहे, ज्यामुळे आपली सांस्कृतिक धरोहर कायम अभंग राहिली आहे.
वनानि दहतो वह्नेः सखा भवति मारुतः।
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम्।।”
***
NitinFulluke/GajendraDeoda/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2211405)
आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam