गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांचे हित सर्वोपरि ठेवले असून  शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी रास्त भाव मिळण्‍यासाठी सरकार  निर्यात वृध्‍दी  करत आहे  :  केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा 


निर्यात वाढवल्याने  शेतकरी त्यांच्या उत्पादनाला  जास्तीत जास्त भाव मिळवू शकतील

कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवणे आणि निर्यात शुल्क 40% वरून 20% पर्यंत कमी करण्याच्या निर्णयामुळे कांद्याची निर्यात वाढेल आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे  उत्पन्नही  वाढेल

बासमती तांदळावरील किमान निर्यात मूल्य  संपुष्टात आणण्याच्या निर्णयामुळे बासमती  उत्पादक शेतकऱ्यांना  निर्यात करून अधिक नफा मिळू शकेल

Posted On: 14 SEP 2024 4:43PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री,अमित शहा यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा आणि त्यांना जास्तीत जास्त मूल्य मिळवता यावे यासाठी निर्यातीला चालना देत आहे.

एक्स’ या समाज माध्‍यमावरील एका पोस्टमध्ये अमित शहा यांनी नमूद केले की, शेतकऱ्यांचे कल्याण सर्वोपरी ठेवून मोदी सरकारने तीन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत:

1. मोदी सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य (एमईपी) हटवण्याचा आणि निर्यात शुल्क 40% वरून 20% करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कांद्याची निर्यात वाढेल, परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.

2. सरकारने बासमती तांदळावरील एमईपी काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे बासमती तांदूळ उत्पादक शेतकरी निर्यात करू शकतील आणि जास्त नफा मिळवू शकतील.

3. याव्यतिरिक्त, मोदी सरकारने कच्चे पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलांच्या आयातीवरील शुल्क 12.5% वरून 32.5% आणि त्यांच्या शुद्ध तेलावरील शुल्क 13.75% वरून 35.75% पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतीय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी चांगला भाव मिळेल, यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल.

***

N.Chitale/S.Bedekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2055016) Visitor Counter : 39