पंतप्रधान कार्यालय

संविधान हत्या दिवस, भारतीय राज्यघटना कशी पायदळी तुडवली गेली याची आठवण करून देणारा दिवस ठरेल : पंतप्रधान.

Posted On: 12 JUL 2024 5:06PM by PIB Mumbai

 

25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिवस' म्हणून घोषित केल्याने, भारतीय संविधान पायदळी तुडवले  गेलेल्या काळाची आठवण करून देईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी X या समाज माध्यमावर पंतप्रधानांची पोस्ट समायिक करताना लिहिले;

“25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळणे म्हणजे, भारतीय राज्यघटना पायदळी तुडवली गेली तेव्हा काय घडले होते याचे स्मरण करणे होय.  आणीबाणी जाहीर करुन काँग्रेसने भारतीय इतिहासाचा काळा टप्पा सुरू केला होता, अशा काळात आणीबाणीच्या अतिरेकाचा त्रास झेललेल्या प्रत्येक व्यक्तीला आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे.

***

S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2032847) Visitor Counter : 37