अर्थ मंत्रालय

अमृत पिढीचे- युवा वर्गाचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे- केंद्रीय अर्थमंत्री


राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 परिवर्तनात्मक सुधारणा घेऊन येत आहे- निर्मला सीतारामन

पीएम श्री शाळा दर्जेदार शिक्षण देत आहेत आणि समग्र आणि परिपूर्ण व्यक्तिमत्वांची जोपासना करत आहेत- निर्मला सीतारामन

पीएम विश्वकर्मा योजना 18 प्रकारच्या व्यवसायांमध्ये सहभागी असलेले कारागीर आणि हस्तकलाकारांना संपूर्ण पाठबळ देत आहे- निर्मला सीतारामन

Posted On: 01 FEB 2024 2:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2024

 

अमृत पिढीचे- युवा वर्गाचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 सादर करताना सांगितले.

युवकांना पुरेशा साधनांनी सुसज्ज करण्यावर आणि त्यांच्या सक्षमीकरणावर आपली समृद्धी अवलंबून असल्याचे सांगून अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 2020 चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण परिवर्तनात्मक सुधारणांची सुरुवात करत आहे. पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया (पीएम श्री) दर्जेदार शिक्षण देत आहे. सर्वांगीण आणि परिपूर्ण व्यक्तींमत्वांची जोपासना करत आहे, असे त्यांनी सांगितले. कौशल्य भारत अभियानाचे यश अधोरेखित करताना सीतारामन यांनी माहिती दिली की, या अभियानाअंतर्गत एक कोटी 40 लाख युवांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. 54 लाख युवांना कौशल्य आणि उच्च कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 3000 नवीन आयटीआय ची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती सीतारामन यांनी दिली. अलीकडेच सुरू करण्यात आलेली पंतप्रधान विश्वकर्मा योजना 18 व्यवसायांमध्ये सहभागी असलेले कारागीर आणि हस्तकलाकारांना  सर्वतोपरी मदत करीत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

देशात उच्च शिक्षण क्षेत्रातील अनेक संस्था विशेषतः 7 आयआयटी, 16 आयआयआयटी, 7 आयआयएम आणि 390 विद्यापीठे स्थापन करण्यात आली आहेत, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

 

* * *

H.Raut/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2001309) Visitor Counter : 75