पंतप्रधान कार्यालय

आसाममधील रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Posted On: 03 JAN 2024 12:01PM by PIB Mumbai

आसाममधील गोलाघाट येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

मृतांच्या वारसाला 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत पी एम एन आर एफ च्या माध्यमातून त्यांनी जाहीर केली. 

पंतप्रधान कार्यालयाने एक्स वरील संदेशात म्हटले आहे: 

"आसाममधील गोलाघाट येथे झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानीमुळे तीव्र दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबांप्रती सहवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे. मृतांच्या वारसाला 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत पी एम एन आर एफ च्या माध्यमातून दिली जाईल: पंतप्रधान"

***

NM/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1992642) Visitor Counter : 98