पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधानांनी रेल्वेमंत्र्यांशी संवाद साधून घेतला परिस्थितीचा आढावा

Posted On: 13 JAN 2022 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2022

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या  रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव  यांच्याशी संवाद साधला  आणि परिस्थितीचा आढावा घेतला. शोकाकुल कुटुंबांप्रति माझ्या संवेदना, जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो  ."

 

 

 

 

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1789798) Visitor Counter : 181