पंतप्रधान कार्यालय

किन्नौर येथील भूस्खलनात अनेक नागरिक मृत्युमुखी पडल्याबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

Posted On: 11 AUG 2021 9:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 11 ऑगस्ट 2021

किन्नौर येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेत अनेक नागरिकांचा बळी गेल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुखः व्यक्त केले आहे.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले,

“किन्नौर येथे घडलेली भूस्खलनाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यादुःखाच्या क्षणी माझ्या संवेदना या दुर्घटनेत बळी पडलेल्यांच्या कुटुंबांसोबत आहेत. या घटनेतील जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारेल अशी आशा मी व्यक्त करतो. या ठिकाणी मदतकार्य सुरु असून ढिगाऱ्याखाली अजूनही अडकून पडलेल्यांना बाहेर काढण्याच्या दृष्टीने शक्य ती सर्व मदत केली जात आहे.”

***

UU/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1745057) Visitor Counter : 159