पर्यटन मंत्रालय

लसीच्या 50 कोटी मात्रांचा पूर्ण झालेला टप्पा, पर्यटन क्षेत्राचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढवणारा -जी किशन रेड्डी

Posted On: 09 AUG 2021 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑगस्‍ट 2021

 

कोविड-19 च्या लसीकरण मोहिमेत 50 लाख मात्रांचा टप्पा पूर्ण झाल्यामुळे पर्यटन क्षेत्राचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे, असे मत केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य भारत विकास मंत्री जी किशन रेड्डी यांनी व्यक्त केले.

Image

"कोविड लसीच्या 50 कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत, या कामगिरीमुळे, सर्वसामान्य लोक, आरोग्य कर्मचारी आणि सरकार अशा सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे भारत कोविड महामारीच्या विळख्यातून बाहेर पडत असल्याचे, आपण जगाला दाखवून दिले आहे. सर्वांना लस, मोफत लस मोहिमेचे हे यश आहे." असे ट्वीट रेड्डी यांनी केले आहे.

 

पर्यंटन क्षेत्राला पुन्हा एकदा चालना देण्यात लसीकरणाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, असे रेड्डी यांनी म्हटले आहे. या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमामुळे  पर्यटन उद्योग पुनरुज्जीवित होईल त्यासोबतच, परदेशी पर्यटकांचा भारतात येण्यासाठीचा आत्मविश्वास वाढेल , ज्यामुळे, देशांतर्गत पर्यंटनाला मोठे पाठबळ मिळेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व नागरिकांनी तसेच पर्यटन क्षेत्राशी संबंधित लोकांनी  लस घ्यावी, जेणेकरुन त्यांचे कोरोना विषाणूपासून संरक्षण होऊ शकेल, असे आवाहन त्यांनी केले. मात्र लस घेतल्यानंतरही सर्वांनी कोविड नियमांचे पालन करत करणे आवश्यक आहे, यावरही त्यांनी भर दिला.

कोविड काळात, आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांनी केलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.

* * *

S.Patil/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1744118) Visitor Counter : 196