अंतराळ विभाग

वर्ष 2022 च्या तिसर्‍या तिमाहीत चांद्रयान -3 अवकाशात सोडले जाण्याची शक्यता आहे - डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 28 JUL 2021 12:05PM by PIB Mumbai

केंद्रीय  विज्ञान आणि  तंत्रज्ञान , भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ; पंतप्रधान कार्यालय , कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणु उर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री  डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, यापुढे  सामान्य कामकाज गृहीत धरून वर्ष 2022 च्या तिसर्‍या तिमाहीत चांद्रयान  -3 अवकाशात सोडले जाण्याची शक्यता आहे . आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात  ते म्हणाले की चांद्रयान  -3 चे काम प्रगतीपथावर आहे.

चांद्रयान -3 च्या तयारीमध्ये साधनांच्या मांडणीला अंतिम रूप देणे,  उपप्रणालीची उपलब्धता, एकात्मीकरण , अवकाशयान पातळीची  तपशीलवार चाचणी आणि पृथ्वीवर प्रणालीच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी  विशेष चाचण्यांचा समावेश आहे. कोविड --19 महामारीमुळे या कामात अडथळा निर्माण झाला होता. मात्र  लॉकडाउन काळातही घरून करणे शक्य असलेली सर्व कामे करण्यात आली. अनलॉक कालावधी सुरू झाल्यानंतर चांद्रयान  -3 चे काम पुन्हा वेगाने सुरू झाले आणि ते अंतिम टप्प्यात आले आहे. 

***

Jaydevi PS/Sushama Kane/Cyadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1739801) Visitor Counter : 306