रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

नितीन गडकरी यांच्या हस्ते आसाममधील 27 महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी सोहळा


​​​​​​​माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कांस्य पुतळ्याचे गडकरी यांच्या हस्ते अनावरण

Posted On: 25 DEC 2020 8:55PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रस्ते आणि महामार्ग आणि एमएसएमई खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज आसाममधील 27 महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी सोहळा पार पडला. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

या प्रकल्पांमध्ये एकूण 439 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत, ज्यासाठी 2,366 कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातील व्यावसायिक वस्तूंची वाहतूक सुलभ होईल, सीमावर्ती भागात संपर्क वाढेल, रोजगाराच्या संधी वाढतील, वेळेची आणि इंधनाची बचत होईल, पर्यटन व मूलभूत विकास होईल आणि मोठ्या बाजारपेठेपर्यंत कृषी उत्पादनांसाठी वाहतूक सुलभ होईल.

नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमादरम्यान माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कांस्य पुतळ्याचे अनावरण केले.

याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले, आसाममध्ये राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विकसित करण्यासाठी राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करणार आहे. ते म्हणाले, सीआरआयएफअंतर्गत राज्यातील 174 प्रकल्पांसाठी 2,104 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, त्यापैकी 1,177 रुपये जारी करण्यात आले आहेत.  2020 मध्ये 1,102 कोटी रुपये खर्च करून 217 किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. 

धुवडी-फूलबारी पुलाचे निर्माण काम पुढील महिन्यात सुरु होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. 19 किमी लांबीच्या पुलासाठी 4,497 कोटी रुपये खर्च येणार आहे. या पुलामुळे आसाम आणि मेघालय यातील अंतर 203 किलोमीटरने कमी होणार आहे. पुढल्या 15 दिवसांत या कामाचा पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी सोहळा करण्यासाठी विनंती करणार असल्याचे गडकरी म्हणाले.    

***

M.Chopade/S.Thakur/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1683717) Visitor Counter : 117