भारतीय निवडणूक आयोग
माध्यमांतील काही जणांनी चुकीची माहिती प्रसारित केल्याबाबत
Posted On:
22 SEP 2020 1:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2020
निवडणूक आयोगाच्या असे निदर्शनास आले आहे, की माध्यमांतील काही जणांनी मुख्य निवडणूक आयुक्त श्री. सुनील अरोरा यांनी दिनांक 21 सप्टेंबर 2020 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला आहे.
कृपया नोंद घ्यावी, की निवडणूक आयोगाने दिनांक 21.9.2020 रोजी 16:30 वाजता नवी दिल्ली येथून एक प्रसिध्दीपत्रक प्रसृत केले होते. "मुख्य निवडणूक आयुक्तांनी असे म्हटले आहे,की
निवडणूक आयोग बिहारचा दौरा करण्याबाबत दोन ते तीन दिवसांच्या आत निर्णय घेईल," असे त्या पत्रकात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
ज्या माध्यम संस्थांनी 'एएनआय' या वृत्त संस्थेच्या वृत्ताचा आधार घेऊन बातमी तयार केली आहे, त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकृत प्रसिध्दीपत्रकाची नोंद घ्यावी, आणि आपल्या वृत्तात दुरुस्ती करावी,अशी विनंती करण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाचा बिहारचा नियोजित दौरा आणि बिहारमधील निवडणूक तारखांची घोषणा याचा आणि एएनआयच्या वृत्तातील माहितीचा परस्परांशी कोणताही संबंध नाही ,याची कृपया नोंद घ्यावी.
* * *
U.Ujgare/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1657642)
Visitor Counter : 112