गृह मंत्रालय
गलवान खोऱ्यात वीरमरण आलेल्या भारतीय जवानांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वाहिली श्रद्धांजली, जवानांच्या कुटुंबियांप्रती व्यक्त केल्या शोकसंवेदना
या जवानांच्या शौर्यातून मातृभूमीविषयीची बांधिलकी व्यक्त : अमित शाह
भारतीय लष्कराला अशा वीर जवानांच्या रुपाने अधिक बळकट करणाऱ्या कुटुंबांना माझे नमन: अमित शाह
या शोककाळात संपूर्ण देश आणि मोदी सरकार या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे: अमित शाह
जखमी जवान लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना
Posted On:
17 JUN 2020 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जून 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गलवान येथे देशाच्या संरक्षणासाठी वीरमरण पत्करलेल्या भारतीय लष्कराच्या हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. ‘आपल्या मातृभूमीचे रक्षण करताना हौतात्म्य पत्करणाऱ्या सैनिकांना गमावण्याचे दुःख शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे”, अशा भावना अमित शहा यांनी व्यक्त केल्या. त्यांचा हा अतुलनीय पराक्रम भारताची मातृभूमीविषयीची कटिबद्धता दर्शवणारा आहे”, असेही अमित शाह यावेळी म्हणाले.
“भारतीय सैन्याला अशा वीर जवानांची भेट देणाऱ्या कुटुंबांसमोर मी नतमस्तक आहे. ह्या जवानांच्या सर्वोच्च त्यागाचे ऋण भारतीयांवर कायम राहील. आज या कुटुंबियांच्या दुःखाच्या काळात, संपूर्ण देश आणि मोदी सरकार खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे. जखमी जवानांची प्रकृती सुधारुन, त्यांना निरोगी आयुष्य लाभो, यासाठी मी प्रार्थना करतो,” असेही गृहमंत्री यावेळी म्हणाले.
S.Pophale/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1632146)