सांस्कृतिक मंत्रालय

गांधी शांतता पुरस्कार 2020 साठी नामांकने मागवण्याची तारीख सरकारने 15 जुन 2020 पर्यंत वाढवली

Posted On: 11 MAY 2020 10:04PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 मे 2020

 

गांधी शांतता पुरस्कारासाठी दरवर्षी सांस्कृतिक मंत्रालयाकडून नामांकने मागवली जातात. गांधी शांतता पुरस्कारासाठीच्या  नियमावली नुसार ही नामांकने असणे आवश्यक असते.  भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर ही नियमावली उपलब्ध आहे.

यावर्षी, 2020 साठी नामांकने पाठवण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2020 होती. देशभरात covid-19  लॉकडाऊन असल्यामुळे गांधी शांतता पुरस्कार 2020 साठी नामांकने  मागवण्याची अंतिम तारीख 15 जून 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

नामांकने किंवा शिफारसी प्रमाणित औपचारिक स्वरूपाची असावीत. आणि ती पत्र किंवा ई-मेल ने खालील पत्त्यावर पाठवावीत

 

श्रीमती निरुपमा कोटरू , संयुक्त सचिव

सांस्कृतिक मंत्रालय,

रूम नंबर 334-c , शास्त्री भवन,

नवी दिल्ली,

टेली फॅक्स नं 011-233981198

ई-मेल jsmuseakad[at]gov[dot]in

mdehuri.rgi[at]nic[dot]in

 

******

B.Gokhale/V.Sahajrao/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1623147) Visitor Counter : 205