वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शेतकरी आणि वस्त्रोद्योग या दोघांच्याही हिताचा विचार करून केंद्र सरकारने 1 जून ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत कापूस आयातीवरील सीमाशुल्कात दिली तात्पुरती सूट

Posted On: 30 MAY 2026 6:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मे 2026

 

कापूस उत्पादक शेतकरी आणि संपूर्ण कापूस मूल्यसाखळीचे हित सर्वोच्च मानत, भारत सरकारने एक जून ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत कापूस आयातीवरील सीमाशुल्क तात्पुरते माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे

कापसाचा हंगाम नसलेल्या कालावधीत लागू करण्यात आलेल्या या उपाययोजनेमुळे वस्त्रोद्योगासाठी कापसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल. तसेच, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पाठबळ मिळेल, उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या खर्चावर नियंत्रण राहील आणि भारतीय वस्त्रोद्योगाची स्पर्धात्मकता अधिक बळकट होईल. याचबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण आणि बाजारातील स्थैर्य कायम राखण्यासही मदत होईल.

 

* * *

राधिका अघोर/आशुतोष सावे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2267036) अभ्यागत कक्ष : 24