पंतप्रधान कार्यालय
परीक्षा पे चर्चा हे कशा प्रकारे जनआंदोलन बनले आहे, भारताच्या शैक्षणिक प्रवासातील एका निर्णायक बदलाचे हे प्रतीक आहे आणि विकसित भारताचा मार्ग प्रशस्त करते; हे सांगणारा एक लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
05 FEB 2026 3:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक लेख सामायिक केला आहे. या लेखामध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ हे जनआंदोलन कसे बनले आहे आणि ही गोष्ट भारताच्या शैक्षणिक प्रवासात एक निर्णायक बदल घडवून आणते; तसेच विकसित भारताचा मार्ग प्रशस्त करते हे स्पष्ट केले आहे.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या ‘एक्स’ या समाज माध्यमावरील पोस्टला उत्तर देताना, पीएमओ इंडिया हँडलने म्हटले आहे:
“या लेखात, केंद्रीय मंत्री @dpradhanbjp यांनी परीक्षा पे चर्चा हे जनआंदोलन कसे बनले , जे भारताच्या शैक्षणिक प्रवासात एक निर्णायक बदल घडवून आणते आणि विकसित भारताचा मार्ग प्रशस्त करते हे स्पष्ट केले आहे.
बाल-केंद्रित दृष्टिकोनासह राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 भारतीय ज्ञान प्रणालींवर लक्ष केंद्रित करून आणि मातृभाषेवर भर देऊन विद्यार्थ्यांना 21 व्या शतकातील आव्हानांसाठी तयार करते, याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला आहे.”
सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2223778)
अभ्यागत कक्ष : 9
Read this releasein:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam