गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज छत्तीसगडमधील न्यू रायपूर येथे सुरक्षा दल जवानांशी साधला संवाद

Posted On: 23 JUN 2025 10:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जून 2025

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज छत्तीसगडमधील न्यू रायपूर येथे सुरक्षा दल जवानांशी  संवाद साधला. जवानांना संबोधित करताना, केंद्रीय गृहमंत्र्यांनी केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, कोब्रा पथके, छत्तीसगड पोलिस आणि जिल्हा राखीव दल (डीआरजी) यांचे धैर्य, शौर्य, त्याग आणि समर्पण याच्याप्रति आदर भाव व्यक्त केला. ते म्हणाले, "मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या सुरक्षा दलांचे शौर्य आणि अथक प्रयत्न हेच नक्षलवादा विरोधातील लढ्याला यश मिळवून देईल."

HWP_2011 (1).JPG

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, सुरक्षा दलांनी माओवाद्यांचे तळ उध्वस्त करताना जे प्रचंड धैर्य, संयम आणि वचनबद्धता दाखवली, त्याने  जगभरातील सुरक्षा दले आश्चर्यचकित झाली. “मला माहित आहे की, आपले जवान जे ध्येय ठरवतात, ते नेहमीच साध्य करतात,” असेही ते म्हणाले. "आपल्या सुरक्षा दलांवरील विश्वासामुळेच मी वारंवार सांगतो, की आपण 31 मार्च 2026 पर्यंत  नक्षलवादाचे उच्चाटन करू." ते म्हणाले.

अमित शहा म्हणाले की, नक्षलवाद हा गरीब आदिवासी भागांसाठी एक मोठी आपत्ती आहे, ज्यामुळे गेल्या 35 वर्षांत सुमारे 40,000 लोकांचा मृत्यू झाला, तर अनेकांना अपंगत्व आले. ते म्हणाले की नक्षलवादी हिंसाचारामुळे गरीब आदिवासी जनता अन्न, वीज, शिक्षण, घरे, शौचालये आणि स्वच्छ पिण्याचे पाणी यासारख्या मूलभूत गरजांपासून वंचित राहिली,  औद्योगिक विकासाची शक्यता तर दूरच. संपूर्ण प्रदेशाला अनेक दशके गुलामगिरीसारख्या परिस्थितीत जगणे भाग पडले आणि या दु:खाचे मूळ कारण, नक्षलवाद हे होते. 

विविध प्रदेशांमधून नक्षलवादाचे उच्चाटन होत असून, छत्तीसगड सरकार अन्न, आरोग्यसेवा, शिक्षण, वीज, गृहनिर्माण, स्वच्छता आणि स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवत आहे, ज्यामुळे इथली जनता  विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडली जात आहे, याबद्दल गृहमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

IMG_7175 (1).JPG

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, जेव्हा एखादे लहान मूल बंदुकीऐवजी पेन्सिल उचलून 'क, ख, ग' लिहू लागते, तेव्हा त्या मुलाचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे भवितव्य बदलते. तो क्षण खूप जवळ आहे."

अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली मार्च 2026 मध्ये जेव्हा देश नक्षलवादापासून मुक्त होईल, तेव्हा तो स्वातंत्र्यानंतरचा सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक  क्षण असेल. ते म्हणाले की, जेव्हा नक्षलवादाच्या उच्चाटनाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आपल्या सुरक्षा दलांचे बलिदान, समर्पण आणि कठोर परिश्रम सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल.

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2139084)