गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मोदी सरकारचा ऐतिहासिक 11 वर्षांचा काळ हा जनसेवेचा संकल्प, साधना आणि समर्पण यांचे सुवर्णयुग - केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन


या 11 वर्षांच्या सेवाकाळात देशाने आर्थिक पुनरुत्थान, सामाजिक न्याय, सांस्कृतिक अभिमान आणि राष्ट्रीय सुरक्षेचे नवे युग अनुभवले आहे

मोदी 3.0 मध्ये सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन या त्रिसूत्रीच्या बळावर नवा भारत वेगाने विकास व आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत आहे

Posted On: 09 JUN 2025 6:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जून 2025

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की, मोदी सरकारचा ऐतिहासिक 11 वर्षांचा काळ हा जनसेवेचा संकल्प, साधना आणि  समर्पण यांचे  सुवर्णयुग ठरला आहे.

अमित शाह यांनी ‘एक्स’ वरील पोस्टच्या मालिकेत म्हटले आहे की, या 11 वर्षांच्या सेवाकाळात देशाने आर्थिक पुनरुत्थान, सामाजिक न्याय, सांस्कृतिक अभिमान आणि राष्ट्रीय सुरक्षेचे नवे युग अनुभवले आहे. जेव्हा नेतृत्व स्पष्ट असते, निर्धार अढळ असतो आणि लोकसेवा हा उद्देश असतो, तेव्हा सेवा, सुरक्षा आणि सुशासनात नव-नवी  शिखरे  गाठता येतात हे मोदी सरकारने सिद्ध केले आहे.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, जेव्हा 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे स्वीकारली, त्या आधीच्या  काळात धोरणांमध्ये ठामपणा नव्हता. स्पष्ट धोरणे नव्हती, नेतृत्व नव्हते आणि भ्रष्टाचार शिखरावर पोहोचला होता, अर्थव्यवस्था ढासळली होती आणि प्रशासन व्यवस्था दिशाहीन होती. मोदी सरकारच्या या 11 वर्षांच्या लोकसेवेत ‘किमान सरकार, कमाल प्रशासन’ या दृष्टिकोनामुळे देशाच्या विकासाचा वेग आणि व्याप्ती या  दोन्हीत  बदल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, महिला, मागासवर्गीय, दलित आणि वंचितांना प्रशासनाच्या केंद्रस्थानी आणले आहे, तुष्टीकरणाच्या जागी "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास" (सर्वांसह, सर्वांसाठी विकास, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न) यावर आधारित कार्य संस्कृती आणली आहे.

अमित शाह म्हणाले की, या 11 वर्षांच्या लोकसेवेत राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रातही अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. नक्षलवाद शेवटच्या घटका मोजत आहे, जम्मू-कश्मीर आणि ईशान्य भारतात शांतता प्रस्थापित झाली आहे आणि भारत आता दहशतवादी हल्ल्यांना दहशतवाद्यांच्या प्रदेशात जाऊन प्रत्युत्तर देतो. हे मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली भारताच्या बदलत्या प्रतिमेचे प्रतीक आहे. मोदी 3.0 मध्ये सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन या त्रिसूत्रीच्या बळावर नवा भारत वेगाने विकास व आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून भारताला प्रत्येक क्षेत्रात क्रमांक एक बनवण्याचा हा प्रवास अशाच पद्धतीने सुरू राहील.

 

 

 

* * *

N.Chitale/R.Dalekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2135200)