गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री श्री. अमित शहा यांनी काल गुजरातची राजधानी गांधीनगर येथे ₹708 कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन केले आणि टपाल खात्याच्या लाभ वितरण कार्यक्रमात मार्गदर्शन केले
भारताच्या सशस्त्र दलांची क्षमता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मजबूत राजकीय इच्छाशक्तीचे आज संपूर्ण जग प्रशंसा करत आहे
आज संपूर्ण जग भारताचे धोरण आणि लष्करी शक्तीकडे विस्मयाने पाहात आहे, आणि पाकिस्तान भीतीच्या सावटाखाली याचा अनुभव घेत आहे
मोदीजींच्या कारकिर्दीत परिपूर्ण झालेल्या हवाई संरक्षण यंत्रणेने भारतीय भूमीवर एकही क्षेपणास्त्र किंवा ड्रोन पडू दिले नाही.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारताने पाकिस्तानच्या आत १०० किलोमीटर अंतरावर बांधलेले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
भारताने पाकिस्तानचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त केले आणि त्यांच्या हवाई दलाची हल्ला करण्याची क्षमता नष्ट केली.
अणुऊर्जेच्या नावाखाली आपल्याला घाबरवणाऱ्यांना आपले हवाई दल, नौदल आणि लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल गृहमंत्र्यांनी तिन्ही सशस्त्र दलांच्या जवानांचे अभिनंदन केले.
दहशतवादविरोधी मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देऊन मोदीजींनी जगाला 'सिंदूर हा भारताचा संस्कार आहे' असा संदेश दिला आहे.
जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय उद्ध्वस्
Posted On:
17 MAY 2025 9:16PM by PIB Mumbai
गुजरातची राजधानी गांधीनगर येथे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री श्री. अमित शाह यांनी ₹708 कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले आणि टपाल खात्याच्या लाभ वितरण कार्यक्रमात ते सहभागी झाले. यावेळी त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या विकास संकल्पनेनुसार संपूर्ण देशाचा विकास केला आणि आज भारत सर्वच क्षेत्रांमध्ये विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

श्री. शाह म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातील प्रत्येक क्षेत्रात विकासच नाही केला तर सुरक्षेचा दर्जाही मोठ्या प्रमाणात उंचावला आहे. 2014 पूर्वी रोजच दहशतवादी हल्ले होत असत, पाकिस्तानातून दहशतवादी येऊन सैनिक आणि सामान्य नागरिकांना मारत आणि बॉम्बस्फोट घडवत, पण त्याला उत्तर दिले जात नसे.

श्री. शाह म्हणाले की, मोदी पंतप्रधान झाल्यापासून उरी, पुलवामा आणि पाहलगाम हे तीन प्रमुख दहशतवादी हल्ले झाले आणि प्रत्येकवेळी भारताने इतक्या ताकदीने उत्तर दिलेआहे की आज संपूर्ण जग आश्चर्याने पाहत आहे आणि पाकिस्तान भीतीने ते अनुभवत आहे. उरीच्या हल्ल्याला भारताने `सर्जिकल स्ट्राइक`द्वारे उत्तर दिले, तर पुलवामा हल्ल्यानंतर हवाई हल्ला करून इशारा दिला.
पहलगामच्या हल्ल्याच्या वेळी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ही कारवाई पाहून संपूर्ण जगातील सुरक्षा तज्ज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय उद्ध्वस्त करून घेतला. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपल्या नागरिकांना, पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारून त्यांच्या कुटुंबियांसमोर निर्दयपणे हत्या केली. भारताने याला आपल्या संस्कृतीनुसार योग्य उत्तर दिले. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सीमेत 100 किमी आत जाऊन दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि त्यांची 9 प्रशिक्षण केंद्रं नष्ट केली.
या स्फोटांच्या आवाजाने जगभरातील दहशतवाद्यांना स्पष्ट संदेश दिला की, भारतावर हल्ला केल्यास त्याला दुप्पट शक्तीने उत्तर दिले जाईल. भारताने पाकिस्तानच्या फक्त दहशतवादी तळांवर हल्ला केला होता परंतु पाकिस्तानी लष्कराने 8 मे रोजी कच्छपासून काश्मीरपर्यंत सामान्य नागरिकांवर हल्ला केला, पण भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने एकही क्षेपणास्त्र किंवा ड्रोन भारतीय भूमीत पडू दिले नाही. 9 मे रोजी भारताने पाकिस्तानच्या 15 हवाई तळांवर हल्ला करून त्यांच्या हवाई दलाची क्षमता निष्क्रिय केली. श्री. शाह म्हणाले की, आज संपूर्ण जग भारतीय सशस्त्र दलांच्या सामर्थ्याची प्रशंसा करत आहे.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारताने पाकिस्तानच्या १०० किमी आत जाऊन पाकिस्तानी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. अणुहल्ल्याच्या नावाखाली आपल्याला घाबरवणाऱ्यांना आपले हवाई दल, नौदल आणि लष्कराने योग्य उत्तर दिले आहे. आज संपूर्ण जग आपल्या सैन्याच्या अचूक प्रहार शक्तीची, त्यांच्या संयमाची आणि पंतप्रधान मोदींच्या दृढ राजकीय इच्छाशक्तीची प्रशंसा करत आहे. आज संपूर्ण देश भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांच्या सैनिकांना सलाम करत आहे.

अमित शहा म्हणाले की, आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्यामुळे संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे. गुजरात आणि भारतमातेचे सुपुत्र असलेले आपले नेते नरेंद्र मोदी यांनी भारतमातेला अभिमान वाटावा आणि देशाला सुरक्षित करण्यासाठी काम केले आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. ते म्हणाले की, जोपर्यंत जगात लष्करी कारवायांची चर्चा होईल, तोपर्यंत ऑपरेशन सिंदूरचीही चर्चा होईल. श्री शाह म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः आपल्या माता आणि भगिनींच्या सन्मानार्थ ठेवले आहे. ते म्हणाले की, सिंदूरचा आदर ही एक भारतीय परंपरा आहे आणि याचे नाव ऑपरेशन सिंदूर असे देऊन संपूर्ण जगाला याचा संदेश देण्यात आला आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये दिलेले वचन पूर्ण केले आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला आपण नक्कीच घेऊ.
***
N.Deshmukh/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2129398)